शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जुलैमध्ये जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 25, 2015 02:12 IST

निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे.

२० दिवसांत १० आत्महत्यांची नोंद : सहा महिन्यांत ७३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन वर्धा: निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे. चालू जुलै महिन्यात अवघ्या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्रच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर होते. त्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येते; मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटकाही या आत्महत्येत भरच घालत आहे. हक्काची रक्कम मिळविण्याकरिता वडध व वाघोडा सारख्या गावातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे आत्महत्येची परवानगी मागावी लागते. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या या शेतकऱ्यावर ही वेळ येते हे जिल्ह्यातील विदारक चित्र आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच जिल्ह्यात पिकांची झालेली अवस्था पाहता गत सहा महिन्यात ७३ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात १३ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नव्या खरीप हंगामात पहिला पाऊस ुपडल्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेली बिजांची वाढच खुंटली. यामुळे यंदाचा हंगाम हातातून जाताना शेतकऱ्यांना बघवत नसल्यामुळे जुलै महिन्याच्या केवळ २० दिवसांत तब्बल १० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याबाबत शासनाला ना खंत ना उसंत असल्याचे दिसून येते. स्थानिक लोकप्रतिनिधी साधे सांत्वना करण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेताना दिसून आले नाही. वर्धा जिल्हा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोडतो. सरकार बदललेले मात्र हा शिक्का पुसला गेला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)मदतीकरिताही आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळ विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची नोंद आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध योजना राबविताना जिल्ह्याचा विचार प्रथम होणे अपेक्षित आहे. तसे होतही आहे; मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ती राबविताना हयगय होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. ही मदत मिळण्याकरिताही शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळी या जिल्ह्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१८ आत्महत्या जिल्ह्यात सन २००१ पासून आतापर्यंत १ हजार २१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५५७ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली आहे. ६५२ शेतकऱ्याच्या आत्महत्या मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.