शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

जुलैमध्ये जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: July 25, 2015 02:12 IST

निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे.

२० दिवसांत १० आत्महत्यांची नोंद : सहा महिन्यांत ७३ शेतकऱ्यांनी संपविले जीवन वर्धा: निसर्गाची अवकृपा, शासनाचा नसलेला आधार यामुळे हतबल झालेला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. वर्धा जिल्ह्यात दिवसाआड शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे विदारक वास्तव आहे. चालू जुलै महिन्यात अवघ्या २० दिवसांत १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्रच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. जिल्ह्यात कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून मदत जाहीर होते. त्याची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येते; मात्र प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटकाही या आत्महत्येत भरच घालत आहे. हक्काची रक्कम मिळविण्याकरिता वडध व वाघोडा सारख्या गावातील शेतकऱ्यांना प्रशासनाकडे आत्महत्येची परवानगी मागावी लागते. एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या या शेतकऱ्यावर ही वेळ येते हे जिल्ह्यातील विदारक चित्र आहे. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असतानाच जिल्ह्यात पिकांची झालेली अवस्था पाहता गत सहा महिन्यात ७३ आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. यात सर्वाधिक आत्महत्या फेब्रुवारी महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात १३ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे समोर आले आहे. जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील २०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नव्या खरीप हंगामात पहिला पाऊस ुपडल्यानंतर तब्बल महिनाभर पावसाने दगा दिला. यामुळे अंकुरलेली बिजांची वाढच खुंटली. यामुळे यंदाचा हंगाम हातातून जाताना शेतकऱ्यांना बघवत नसल्यामुळे जुलै महिन्याच्या केवळ २० दिवसांत तब्बल १० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. याबाबत शासनाला ना खंत ना उसंत असल्याचे दिसून येते. स्थानिक लोकप्रतिनिधी साधे सांत्वना करण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेताना दिसून आले नाही. वर्धा जिल्हा विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोडतो. सरकार बदललेले मात्र हा शिक्का पुसला गेला नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. (प्रतिनिधी)मदतीकरिताही आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळ विदर्भात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून वर्धेची नोंद आहे. यामुळे शेतकऱ्यांकरिता असलेल्या विविध योजना राबविताना जिल्ह्याचा विचार प्रथम होणे अपेक्षित आहे. तसे होतही आहे; मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडून ती राबविताना हयगय होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. ही मदत मिळण्याकरिताही शेतकऱ्यांना आत्महत्येची परवानगी मागण्याची वेळी या जिल्ह्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२१८ आत्महत्या जिल्ह्यात सन २००१ पासून आतापर्यंत १ हजार २१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ५५७ शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळाली आहे. ६५२ शेतकऱ्याच्या आत्महत्या मदतीकरिता अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.