शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

कॅनलच्या अर्धवट कामाने शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:04 IST

जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.

ठळक मुद्दे३० मीटर जागा सोडून केले नालीचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे.येथील शेतकरी प्रमोद गजानन पाटील यांचे सोनेगाव (आ.) पांदन रस्त्याच्या बाजुला चिकणी शिवारात ४ एकर ओलीताखालील शेत आहेत. याच शेतातील ०.७८ हे.आर. शेत निम्न वर्धा प्रकल्पाच्या कालव्यात गेले. याची ८० टक्के रक्कम मिळाली पण उर्वरीत रक्कम व अधिग्रहीत विहिर व आम्रवृक्ष यांची मात्र आतापर्यंत रक्कम मिळाली नाहीत.याच शेतातून ०.७८ हे.आर मधून मोठा कालवा गेला आहेत. याच कालव्याचे पाणी शेताला लागुन असलेल्या नाल्यात सोडण्याकरिता पाटील यांच्या शेतातून नाली काढण्यात आली. परंतु कालव्याच्या तोंडाजवळ सिमेंटीकरण केलेत व नंतर ३० मिटर जागा सोडून पुन्हा सिमेंटीकरण करण्यात आले. परंतु मध्य भागातच ३० मीटरच्या नालीचे बांधकाम न केल्यामुळे येणारे पाणी सरळ शेतात घुसून शेत पडीत पडण्याची दाट शक्यता आहे. संबंधीत विभागाने लक्ष देऊन अर्धवट सोडलेल्या नालीचे पुर्णत: सिमेंटीकरण करावेत अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. अशीच परिस्थिती या भागात अनेक ठिकाणी असल्याचे दिसून येत आहे.मी या शेतात ६ ट्रॉली शेणखत टाकले. परंतु ३० मीटर नालीचे सिमेंटीकरण न केल्यामुळे येणाऱ्या पाण्यामुळे पुर्णच शेणखत वाहून जाईल. यात माझे मोठे नुकसान होणार आहे.- प्रमोद पाटील, श्ोतकरी चिकणी.