शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

विकासकामांनी शेतकऱ्यांची वाढविली डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 23:20 IST

जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.

ठळक मुद्देकालव्याच्या खोदकामाने वाहतुकीस अडथळा : वाहनचालकांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : शासनाकडून केल्या जात असलेल्या विकासकामांमुळे सुविधेऐवजी गैरसोयच अधिक होत असल्याचे चित्र चिकणी परिसरात दिसून येत आहे. यामध्ये मुख्यत: महामार्ग जलयुक्त शिवार अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प यशोदा नदी खोरे पुनर्जीवनअंतर्गत नदी, नाले, खोलीकरण, रूंदीकरण, सरळीकरण आदी विकासकामे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीच ठरत असल्याचे वास्तव आहे.विकास कामांमुळे डेरेदार वृक्ष धाराशाही पडलेत. तसेच जिल्ह्यातील कित्येक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिके खराब झालीत. तर कुठे बांध फुटून सुपीक मातीसह पिके खरडून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी व नुकसानच अधिक झाले.अधिकाऱ्यांनी कामामध्ये अनियमितता दाखविल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना खोदकामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. चिकणी, पढेगाव, वर्धा हा १६ कि.मी. अंतराचा डांबरी रस्ता असून या रस्त्यावर तीन ठिकाणी कालव्याच्या कामाकरिता खोदकाम करण्यात आले. भोयर यांच्या शेताजवळच्या वळणावर व रमेश नेहारे यांच्या शेताजवळ कालव्याच्या पाटसऱ्या टाकण्यात आल्यात. तिन्ही ठिकाणी डांबरीकरण अथवा सिमेंटीकरण गरजेचे होते. परंतु, ठिकाणी माती टाकून बुजविण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे वर्दळ असते. एसटी बससह स्कूलबस, दुचाकी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. खोदकामामुळे पडलेल्या खड्ड्यांचे सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी तथा वाहनचालक करीत आहेत.कामांचा दर्जाही सुमारचिकणी जामणी, पढेगावसह अन्य भागात विकासकामे सुरू आहेत; मात्र कामांचा दर्जा सुमार असल्याची ग्रामस्थांची ओरड आहे. विकासकामे करताना निदान काही दिवस तग धरतील, अशी करावी, असे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.