शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

शेतकरी धडकले कचेरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:41 IST

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला.

ठळक मुद्देवर्धेतही निदर्शने : मुंबईतील मोर्चाच्या समर्थनार्थ

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा १८० कि़मी.चा ‘लाँग मार्च’ काढला. यात पदयात्रेत सहभागी शेतकऱ्यांना सहकार्य म्हणून सोमवारी वर्धेत काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांच्या मागण्या सादर केल्या.शेतकºयांकडून स्वामिनाथन कमिशन प्रमाणे हमी दर द्या, बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा, कसणाऱ्या शेकऱ्यांच्या नावे वनजमिनी करा, वीज बिले माफ करा, आदी मागण्यांना करण्यात आल्या आहेत. मुंबई येथे गेलेल्या शेतकºयांच्या मार्चोत राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून ५० हजारावर शेतकरी सहभागी झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातून निवडक शंभरावर शेतकरी सहभागी आहेत.राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली नाहीच, शिवाय २०१७ मध्ये नाशिकमध्ये महामुक्काम शेतकरी आंदोलनाचे वेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले लिखित आश्वासनही पाळले नाही. त्यामुळे नाईलाजाने नाशिक ते मंत्रालय, मुंबई असा शेतकरी ‘लाँग मार्च’ निघाला आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या मागण्यांचे निवेदनसर्व शेतमालाचे हमी दर स्वामीनाथन कमीशनप्रमाणे वाढवून द्या, ते दर बाजारपेठेत मिळतील अशी व्यवस्था करा. शेतमालाचा हमी दर उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून निश्चित करा. सर्व शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा, लोडशेडींग बंद करा, शेतीला तेलंगणा व इतर राज्याप्रमाणे मोफत वीज पुरवठा करा. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ४० हजार रूपये नुकसा भरपाई द्या. अप्पर वर्धा-लोअर वर्धा या धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी पर्यायी जमिनीचे पैसे भरले. त्यांना पर्यायी जमीन द्या. त्यांना मिळणारा निर्वाह भत्ता वाढवून प्रती महा ४०० रूपयांऐवजी ३००० रुपये करा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा खर्च राज्य सरकारने उचलावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना प्रत्येकी १० लाख रूपये द्या. दुधाचे हमी दर प्रती लिटर ५० रूपये करा. प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत भाजी मंडीचे निर्माण करा.यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे.