शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकरी समृद्ध झाला पाहिजे

By admin | Updated: May 7, 2017 00:40 IST

मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे.

देवेंद्र फडणवीस : आर्वी शहर स्वच्छ करण्याचा संकल्प लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : मागील दोन वर्षांत राज्यात भाजपा सरकारने अनेक विकासात्मक योजना हाती घेतल्या आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन व मार्केट वाढविण्याच्या दृष्टीने सरकारचे सकारात्मक पाऊल राहणार आहे. शेतकरी उत्पादन वाढवून समृद्ध झाला पाहिजे, हाच विचार घेऊन आमची वाटचाल सुरू आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. शुकवारी पं.स. सभागृहातील आढावा बैठकीनंतर माजी आमदार दादाराव केचे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षांत शेतकरी संकटात सापडला; पण यावर्षी महाराष्ट्रात बारा टक्के उत्पादन वाढून ४० हजार कोटीने शेतपिकांचे उत्पादन वाढले आहे. पुढच्या अडीच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल व शेती सुक्ष्म सिंचनातून कशी विकसित करता येईल, याबाबत ठोस पावले उचलणे सुरू आहे. आतापर्यंत शासनाने शहर स्वच्छ करण्यासाठी २१ हजार कोटी रुपये दिले. शहर स्वच्छ झाले तर रोजगार वाढतील. त्यासाठी आर्वी पालिकेने सर्वप्रथम शहर स्वच्छ करणे, सांडपाण्याचे काम व त्या पाण्याचे नियोजन या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे, ते अग्रक्रमाने करण्यात येईल, असेही सांगितले. आर्वी तालुक्यातील उपसा सिंचन योजनेतून तयार झालेल्या सुक्ष्म सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या ९ हजार एकर शेताला सिंचन होऊन उत्पादन वाढेल, असा आशावादही फडणवीस यांनी व्यक्त केला. माजी आमदार केचे यांनी आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाची समस्या, आर्वीत एमआयडीसीची गरज व इतर समस्या मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावाव्या, असे सांगत आर्वी शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी दिल्याचा उल्लेख केला. यावेळी खा. रामदास तडस, माजी खासदार विजय मुडे, आर्वीचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, जि.प. समाज कल्याण सभापती निता गजाम, सोनाली कलोडे मुकेश भिसे, कांचन नांदुरकर, युवराज ढोल, सुरेश खवशी, आर्वी न.प. उपाध्यक्ष पल्लवी काळे, वसंत भांगे, मुकूंद बारंगे, दाऊदी बोहरा व मुस्लीम समाजाचे पदाधिकारी, आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील जि.प., पं.स. व नगर पंचायत सदस्य, तालुक्याचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन करीत उपस्थितांचे आभार गजानन भोरे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांना निम्न वर्धा प्रकल्पग्रस्त समिती, सर्कसपूर ग्रामस्थ, अंशकालीन कर्मचारी संघटना, निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत समस्यांबाबत अवगत केले. कार्यकर्त्यांचाही घेतला आढावा आढावा बैठकीनंतर माजी आमदार केचे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. याप्रसंगी आपले सरकार शेतकऱ्यांसाठीच काम करणार असल्याचे सांगत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या पोहोचविण्याचे आवाहन केले. आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी हजर होते. आर्वी उपविभागातील कारंजा येथील नगर पंचायतीला विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आर्वी विधानसभा संघाचे आ. अमर काळे यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करीत राष्ट्रीय महामार्गावरील शहर आणि नगर पंचायत झालेले कारंजा विकास कामात कसे मागे राहिले, हे समजावून सांगितले. याप्रसंगी कारंजा शहरासह आर्वी विधानसभा मतदार संघातील विविध समस्यांबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व बाबी ऐकून घेत विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.