शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:35 IST

निव्वळ शेती ही सध्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा करावा. जोडधंद्यांतून मिळणारे नियमित उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करू शकते.

ठळक मुद्देशैलेश नवाल : शेतकरी बचत गटाच्या दालमिलचा श्रीगणेशा

ऑनलाईन लोकमतकेळझर : निव्वळ शेती ही सध्या शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याने त्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा करावा. जोडधंद्यांतून मिळणारे नियमित उत्पन्न शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करू शकते. शेतकऱ्यांनी शेतीच्या २० टक्के सिंचन क्षेत्रात कपाशी या पिका व्यतिरिक्त ऊस, तूती यासारखे अन्य पीक घ्यावे. दलालांमुळे शेतीपिकांना योग्य भाव मिळत नाही. हमी भाव पाहिजे असेल तर शेतमालाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे. शेतीवरील उत्पादन खर्च कमी केल्यास शेती करणे परवडणारी ठरू शकते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.जय किसान स्वयं सहाय्यता बचत गटाच्यावतीने सुरू केलेल्या दाल मिलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्थानिक आर. सी. एफ. च्या गोदामामध्ये सुरू करण्यात आलेल्या दालमिलचा श्रीगणेशा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जि.प. सदस्य विनोद लाखे, तहसीलदार महेंद्र सोनवणे, तालुका कृषी अधिकारी वाघमारे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक राईकवार, सरपंच रेखा शेंदरे, उपसरपंच फारूख शेख, बचत गटाचे अध्यक्ष शांताराम तेलरांधे आदींची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती.जिल्ह्यात पांदन रस्ते मोकळे करून देण्याचे काम सुरू असून त्यासाठी शेतकऱ्यांनी २५ टक्के रक्कम भरल्यास ७५ टक्के रक्कम शासन खर्च करणार आहे. शिवाय शेतकरी गटांनी त्यांच्या गावात टूल बँक सुरू करावी. शेतकºयांनी नैसर्गिक शेती करावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी नवाल यांनी केले. ही दालमिल केळझर व परिसरातील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांना फायद्याची ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक लक्ष्मीकांत वन्हाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय किसान स्वयं सहाय्यता बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यक्रर्त्यांनी सहकार्य केले.