साहुर : शेतकऱ्यांने कर्जबाजारी होऊन प्रसंगी आपला जीव गहाण ठेवून शेती करीत आहे. नशिबी आपत्तीचा डोंबर आणि आता अतिथंडी आणि पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला़ अशा अवस्थेत घरात आलेला थोडासा कापूस विकावा म्हटले तर व्यापारी शेतकऱ्यांना वजन-काट्यामध्ये लुटतो़ त्यामुळे येथील दीपक खरडे यांनी सुरू केलेले शेतकरी बचाव अभियान शेतकऱ्यांना आधार वाटू लागत आहे़कापूस व्यापारी हे कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांना कशाप्रकारे लुटतात हे आष्टी तालुका गुरूदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी दीपक खरडे हा शेतकऱ्यांना एक प्रात्याक्षिकद्वारे समजावून देतो़ चोर व्यापारी कापूस विकत घेताना अनेक सांकेतिक शब्द वापरतात. कापूस मोजण्यासाठी आपलाच मोजणारा व आपलाच काटा (तराजू) व गोटा वापरणे, काट्याला समोरची पासंग (थैली) लाऊ न देता ३ ते ५ किलो कापूस चोरणे असे प्रकार तो समजावून सांगतो. कापूस मोजताना शेतकरी हे व्यापाऱ्याच्या भूलथापांना बळी पडतात. गोष्टीमध्ये घुमवून तसेच मजुरांकडून गोंधळ वजनात दांडी मारत असतो. त्यामुळे शेतकरी वर्गाने कापसाचा काटा होत असताना अतिशय जागरूक राहण्याची गरज या अभियानात प्रात्यक्षिकांसह समजावून सांगतो. खरडे हा तालुक्यात गावोगावी फिरून जनजागृती करीत आहे. चोर व्यापारी हा मार्केट पेक्षा २०० क्विंटल भाव जास्त देतो पण एक क्विंटल मागे १० किलो हमखास कापूस चोरतो़. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडून स्वत:ची फसवणूक होऊ नये, याची काळजी घेण्याचा सल्लाही तो देत आहे.(वार्ताहर)
कापूस व्यापाऱ्यांपासून शेतकरी बचाव अभियान
By admin | Updated: January 3, 2015 01:43 IST