शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

शेतकरी, ओबीसींचे मानवी हक्क पायदळी

By admin | Updated: December 11, 2015 02:38 IST

मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय,...

वर्धा : मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, शिष्यवृत्तीसाठी सहा लाख उत्पन्न मर्यादा, शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या आदी मागण्यांचे निवेदन गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी मोहनमाला नाझिरकर यांनी स्वीकारले. यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, संघटक विनय डहाके, वर्धा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय म्हस्के, संजय भगत, सुनील दुबे, श्याम जगताप, राजु नांदुरकर, वासुदेव कुबडे, रविभुषण तांगडे, अशोक बानाईत, जयवंत भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र्याला ६६ वर्षांचा कालावधी लोटला, तरी ५४ टक्के ओबीसी व ८० टक्के शेतकरी आणि त्यावर आधारीत ग्रामीण जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. राज्य घटनेचे कलम ३४० नुसार घटनात्मक संरक्षण असताना सुध्दा ओबीसींसाठी एससी, एसटी प्रमाणे स्वतंत्र सूची नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करावी, शेती उत्पादनाला भाव देण्यासाठी स्वामीनाथ आयोग त्वरीत लागू करावा, शेतकऱ्यांना त्यांच्या ओलिताच्या विहिरीवर तात्काळ वीज जोडणी द्यावी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा योजनेचे निकष लावून तात्काळ सरकारी नोकरी द्यावी. तोपर्यंत दरमहा वीस हजार रुपये मानधन त्या शेतकरी कुटुंबाला देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.(प्रतिनिधी)