शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, ओबीसींचे मानवी हक्क पायदळी

By admin | Updated: December 11, 2015 02:38 IST

मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय,...

वर्धा : मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, शिष्यवृत्तीसाठी सहा लाख उत्पन्न मर्यादा, शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या आदी मागण्यांचे निवेदन गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी मोहनमाला नाझिरकर यांनी स्वीकारले. यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, संघटक विनय डहाके, वर्धा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय म्हस्के, संजय भगत, सुनील दुबे, श्याम जगताप, राजु नांदुरकर, वासुदेव कुबडे, रविभुषण तांगडे, अशोक बानाईत, जयवंत भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र्याला ६६ वर्षांचा कालावधी लोटला, तरी ५४ टक्के ओबीसी व ८० टक्के शेतकरी आणि त्यावर आधारीत ग्रामीण जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. राज्य घटनेचे कलम ३४० नुसार घटनात्मक संरक्षण असताना सुध्दा ओबीसींसाठी एससी, एसटी प्रमाणे स्वतंत्र सूची नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करावी, शेती उत्पादनाला भाव देण्यासाठी स्वामीनाथ आयोग त्वरीत लागू करावा, शेतकऱ्यांना त्यांच्या ओलिताच्या विहिरीवर तात्काळ वीज जोडणी द्यावी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा योजनेचे निकष लावून तात्काळ सरकारी नोकरी द्यावी. तोपर्यंत दरमहा वीस हजार रुपये मानधन त्या शेतकरी कुटुंबाला देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.(प्रतिनिधी)