शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, ओबीसींचे मानवी हक्क पायदळी

By admin | Updated: December 11, 2015 02:38 IST

मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय,...

वर्धा : मानवता हक्क दिनाचे औचित्य साधत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय, शिष्यवृत्तीसाठी सहा लाख उत्पन्न मर्यादा, शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या आदी मागण्यांचे निवेदन गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पोहोचविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी मोहनमाला नाझिरकर यांनी स्वीकारले. यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, संघटक विनय डहाके, वर्धा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय म्हस्के, संजय भगत, सुनील दुबे, श्याम जगताप, राजु नांदुरकर, वासुदेव कुबडे, रविभुषण तांगडे, अशोक बानाईत, जयवंत भालेराव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वतंत्र्याला ६६ वर्षांचा कालावधी लोटला, तरी ५४ टक्के ओबीसी व ८० टक्के शेतकरी आणि त्यावर आधारीत ग्रामीण जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. राज्य घटनेचे कलम ३४० नुसार घटनात्मक संरक्षण असताना सुध्दा ओबीसींसाठी एससी, एसटी प्रमाणे स्वतंत्र सूची नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची तीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करावी, शेती उत्पादनाला भाव देण्यासाठी स्वामीनाथ आयोग त्वरीत लागू करावा, शेतकऱ्यांना त्यांच्या ओलिताच्या विहिरीवर तात्काळ वीज जोडणी द्यावी. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा योजनेचे निकष लावून तात्काळ सरकारी नोकरी द्यावी. तोपर्यंत दरमहा वीस हजार रुपये मानधन त्या शेतकरी कुटुंबाला देण्यात यावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत.(प्रतिनिधी)