शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

शेतकऱ्यांची रात्र बाजारात

By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे ..

वर्धा कृऊबा समिती : व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाववर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या यार्डवरच काढावी लागत आहे. सकाळी आपल्या गावाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या साहित्याचे वेळीच मोजमाप करण्याऐवजी येथे व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाव होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकीय मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात आवक वाढली आहे. या तुलनेत येथे असलेले हमाल व मोजमाप करण्याकरिता आवश्यक काट्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सकाळी बाजारात उत्पन्न घेवून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोजमापाकरिता रात्र काढावी लागते. शिवाय बाजार समितीत शेतकऱ्यांंच्या मुक्कामाकरिता कुठलीही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात आणलेल्या त्यांच्या उत्पादनावरच झोपावे लागत आहे.(प्रतिनिधी) लिलाव ११ वाजता करण्याची मागणीवर्धा बाजार समितीत आवक वाढत आहे. यामुळे येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास लिलाव झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकून घर गाठणे साईचे होईल. ज्या शेतकऱ्याचे एक किंवा दोन क्विंटल धान्य आहे अशा शेतकऱ्यांना येथे रात्र काढण्याची गरज पडणार नसल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. काही शेतकरी स्वत:च्या गाडीने येतात. ते काटा होताच निघून जातात. मात्र त्यांच्याकडे अशी सोय नाही त्या शेतकऱ्यांना रात्री हॉल्टींग बस शिवाय पर्याय नसतो. ती बस आठ वाजेपर्यंत असते. कधी वेळेवर रक्कम मिळाल्यास या बसने गेलेल्या शेतकऱ्याला लुटारूंची भीती असते. यामुळे लिलावाची वेळ बदलल्यास शेतकऱ्यांना सोईचे होईल, असे बोलले जात आहे.