शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

शेतकऱ्यांची रात्र बाजारात

By admin | Updated: April 30, 2016 02:18 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे ..

वर्धा कृऊबा समिती : व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाववर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसागणिक आवक वाढत असून येथे असलेल्या अपुऱ्या साधन सामग्रीमुळे शेतकऱ्यांना रात्र बाजार समितीच्या यार्डवरच काढावी लागत आहे. सकाळी आपल्या गावाहून आलेल्या शेतकऱ्यांच्या साहित्याचे वेळीच मोजमाप करण्याऐवजी येथे व्यापाऱ्यांच्या मर्जीने लिलाव होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या व्यवस्थापकीय मंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात आवक वाढली आहे. या तुलनेत येथे असलेले हमाल व मोजमाप करण्याकरिता आवश्यक काट्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सकाळी बाजारात उत्पन्न घेवून आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या मोजमापाकरिता रात्र काढावी लागते. शिवाय बाजार समितीत शेतकऱ्यांंच्या मुक्कामाकरिता कुठलीही सुविधा नसल्याने शेतकऱ्यांना बाजारात आणलेल्या त्यांच्या उत्पादनावरच झोपावे लागत आहे.(प्रतिनिधी) लिलाव ११ वाजता करण्याची मागणीवर्धा बाजार समितीत आवक वाढत आहे. यामुळे येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास लिलाव झाल्यास शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकून घर गाठणे साईचे होईल. ज्या शेतकऱ्याचे एक किंवा दोन क्विंटल धान्य आहे अशा शेतकऱ्यांना येथे रात्र काढण्याची गरज पडणार नसल्याच्या प्रतिक्रीया काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या. काही शेतकरी स्वत:च्या गाडीने येतात. ते काटा होताच निघून जातात. मात्र त्यांच्याकडे अशी सोय नाही त्या शेतकऱ्यांना रात्री हॉल्टींग बस शिवाय पर्याय नसतो. ती बस आठ वाजेपर्यंत असते. कधी वेळेवर रक्कम मिळाल्यास या बसने गेलेल्या शेतकऱ्याला लुटारूंची भीती असते. यामुळे लिलावाची वेळ बदलल्यास शेतकऱ्यांना सोईचे होईल, असे बोलले जात आहे.