शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाच्या हत्यारापुढे नमला कृषी विभाग

By admin | Updated: May 30, 2015 00:12 IST

कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत कृषिमित्रांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात ..

कृषिमित्रांचे दोन दिवस आमरण उपोषण : आश्वासनानंतर आंदोलन मागेआष्टी (श.) : कृषी विभाग व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत कृषिमित्रांच्या विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे २५ मे पासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनापूढे कृषी विभागाने नमते घेत कृषिमित्रांना आश्वासन दिले. यामुळे बुधवारी उपोषणाची सांगता करण्यात आली. तालुक्यात ४८ कृषिमित्र कार्यरत आहे. गत ६ वर्षांपासून हे कृषिमित्र शेतकरी, कृषिसहायक यांच्याशी निगडीत कामे करतात. कृषिमित्रांना मानधन दिले जात नाही. गत अनेक वर्षांपासून कर्तव्यसुची, ओळखपत्र, सन्मानाची वागणूक दिली नाही. साहित्यही वितरित केले नाही. यामुळे शासनाच्या योजना राबवूनही सातत्याने कृषिमित्रांना त्रास दिला जात आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कृषिमित्र युवा कामगार संघटना स्थापन करून अध्यक्ष आशीष वाघ, सचिव राहुल पडोळे यांनी कृषी विभागासमोर उपोषण सुरू केले. उपोषणाला उपविभागीय कृषी अधिकारी अरुणा बलसोगे, तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांनी कृषिमित्रांची भेट घेऊन सर्व मागण्यांवर चर्चा केली. यात प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून २ जून रोजी प्रकल्प संचालकाच्या कार्यालयात संयुक्त चर्चा करण्याकरिता पाचारण करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या चार प्रतिनिधींनी चर्चेला येण्याचे कळविले आहे. लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आशीष वाघ, राहुल पडोळे, सुरेंद्र नागपुरे, प्रफुल्ल डहाके यांना निंबूपाणी देत उपोषणाची सांगता करण्यात आली. भाजपाचे तालुका सरचिटणीस गजानन भोरे, अजय लोखंडे यांनीही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.(प्रतिनिधी)मानधन, कर्तव्यसूची व ओळखपत्रांपासूनही वंचितआष्टी तालुक्यात ४८ कृषिमित्र सहा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना मानधन देण्यात येत नाही. शिवाय कर्तव्यसुची नाही, ओळखपत्रही नाही आणि सन्मानाची वागणुकही नाही. यामुळे ते त्रस्त झाले आहे. कृषी सहायकांना गावात मदत करणारे हे कृषिमित्र साहित्यापासूनही वंचितच होते. यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. याची दखल घेत चर्चेस बोलविण्यात आले.