शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

By admin | Updated: April 30, 2017 01:04 IST

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, ...

तहसीलदारांना निवेदन : सावकारांना बेड्या ठोकण्याची मागणीहिंगणघाट : स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. सर्व शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर किसान सभेद्वारे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार यादव व उपविभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.सावकारीच्या पैशात शेताची विक्री करून घेऊन शेती हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकारांना बेड्या ठोका. वहिवाटदार म्हणून शेताच्या सात-बारावर नोंद घेण्याची सर्व प्रकरणे निकाली काढावी. सिलींग जमिनीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील गोविंदपूरचे प्रकरण त्वरित निकाली काढावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात यशवंत झाडे, जगन चांभारे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, भास्कर डवरे, प्रशांत चरडे, गजानन काळे, देवेंद्र शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, रामभाऊ खेलकर, विनोद दातारकर आदंचा समावेश होता. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले. राज्य उपाध्यक्ष झाडे यांनी जगाला जगविणारा, धान्य पिकविणारा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो. दरवर्षी ५ हजारांहून अधिक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात. या आत्महत्यांचे सत्र आता त्यांच्या कुटुंबात मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे; पण राज्य व केंद्र शासनाला याची चिंता नाही. आम्हाला दिल्ली-मुंबईच्या तक्तावर बसवा, राज्य द्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे पूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. सत्तेसाठी सर्व काही, ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ असा अनुभव शेतकरी भाजपाच्या राज्यात घेत असल्याचे दिसते. दोघांच्याही राज्यात शेतकरी आत्महत्या व शेतमाल लुटीची प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन संघर्ष करावा व न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, जानराव नागमोते, संजय भगत, पांडुरंग राऊत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जगन चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत चरडे यांनी मानले. धरणे आंदोलनामध्ये किसान सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा व आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्ती राखुंडे, प्रफुल लढी, निलेश चरडे, श्रीकृष्ण बावणे, विनोद नगराळे, गुलाब घाटे, बाबाराव वैरागडे, कवडू मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)