शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शेतमालाला भाव व कर्जमुक्तीसाठी किसान सभेचे धरणे

By admin | Updated: April 30, 2017 01:04 IST

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, ...

तहसीलदारांना निवेदन : सावकारांना बेड्या ठोकण्याची मागणीहिंगणघाट : स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशीप्रमाणे शेतमालाचे हमीदर निश्चित करावे. ते दर बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था करावी. सर्व शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा यासह अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर किसान सभेद्वारे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार यादव व उपविभागीय अधिकारी पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.सावकारीच्या पैशात शेताची विक्री करून घेऊन शेती हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अवैध सावकारांना बेड्या ठोका. वहिवाटदार म्हणून शेताच्या सात-बारावर नोंद घेण्याची सर्व प्रकरणे निकाली काढावी. सिलींग जमिनीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील गोविंदपूरचे प्रकरण त्वरित निकाली काढावे, आदी मागण्याही करण्यात आल्या. शिष्टमंडळात यशवंत झाडे, जगन चांभारे, जानराव नागमोते, चंद्रभान नाखले, भास्कर डवरे, प्रशांत चरडे, गजानन काळे, देवेंद्र शिनगारे, ज्ञानेश्वर वैरागडे, रामभाऊ खेलकर, विनोद दातारकर आदंचा समावेश होता. यावेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी चर्चेअंती मागण्या त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले. राज्य उपाध्यक्ष झाडे यांनी जगाला जगविणारा, धान्य पिकविणारा शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो. दरवर्षी ५ हजारांहून अधिक शेतकरी शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करतात. या आत्महत्यांचे सत्र आता त्यांच्या कुटुंबात मुला-मुलींपर्यंत पोहोचले आहे; पण राज्य व केंद्र शासनाला याची चिंता नाही. आम्हाला दिल्ली-मुंबईच्या तक्तावर बसवा, राज्य द्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असे पूर्वी आश्वासन देणाऱ्या भाजपला त्यांच्याच घोषणेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. सत्तेसाठी सर्व काही, ‘बोलाचीच कढी व बोलाचाच भात’ असा अनुभव शेतकरी भाजपाच्या राज्यात घेत असल्याचे दिसते. दोघांच्याही राज्यात शेतकरी आत्महत्या व शेतमाल लुटीची प्रक्रिया सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी किसान सभेच्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन संघर्ष करावा व न्याय मिळवून घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, जानराव नागमोते, संजय भगत, पांडुरंग राऊत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जगन चांभारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत चरडे यांनी मानले. धरणे आंदोलनामध्ये किसान सभेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा व आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता निवृत्ती राखुंडे, प्रफुल लढी, निलेश चरडे, श्रीकृष्ण बावणे, विनोद नगराळे, गुलाब घाटे, बाबाराव वैरागडे, कवडू मेश्राम आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)