शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 31, 2016 00:39 IST

नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

फणिंद्र रघाटाटे वर्धा नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी यात असलेल्या जाचक अटी रद्द करून नव्याने सुधारित पीक विमा योजना सुरू केली. नव्या योजनेनुसार भरावा लागणारा हप्ता अत्यल्प असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे; पण योजनेत सहभागी झालेल्यांना मिळणारे नुकसान एक खासगी कंपनी देणार असल्याने त्या कंपनीच्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अर्जाकरिता शेतकरी भटकत असताना योजनेची अंतिम तारीख आली आहे. अर्जाची मागणी वाढत असल्याने शासनाच्यावतीने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण ही मुदतवाढ शेतकऱ्यांच्या मागणीवरून नाही तर बँकांच्या संपामुळे देण्यात आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेची अंतिम तारीख आता २ आॅगस्ट करण्यात आली. असे असले तरी योजनेतील अटी व नियम दरदिवशी बदलत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आधी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच वेगळी कार्यवाही करण्याची गरज नव्हती. कर्जाच्या हप्त्यातून बँक पीक विमा योजनेचा हप्ता कापून घेत होते. यावर्षी याशिवाय ज्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना पंचायत समितीकडून ठरविलेला अर्ज भरून तो बँकेत जमा करणे आवश्यक केले. त्यानुसार सदर अर्ज मिळवून तो भरून बँकेत जमा केला. अशात कृषी सहायकांनी जी कंपनी विम्याचा लाभ देणार आहे, त्या कंपनीने योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याद्वारे नियोजित केलेला अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना कळविले. नुकसान भरपाई देणारी कंपनी पिकांची पाहणी सॅटेलाईटद्वारे करून नुकसानीचा निर्णय घेणार आहे. शासनाने योजनेबाबत प्रसिद्धी केल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होत आहे. अशात कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यावर खरच नुकसान भरपाई मिळेल की शेतकऱ्यांना लुटण्याचाच हा प्रकार आहे, अशी चर्चा असली तरी योजनेत सहभागी होणाऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. शेतकऱ्यांवर कृषी सहायकाच्या मागे धावण्याची वेळ शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेल्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सदर अर्ज कृषी सहाय्यकाजवळ उपलब्ध असून तो मिळविणे शेतकऱ्यांसाठी कटकटीचे झाले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशा व्यस्त कालावधीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.