शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 31, 2016 00:39 IST

नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

फणिंद्र रघाटाटे वर्धा नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी यात असलेल्या जाचक अटी रद्द करून नव्याने सुधारित पीक विमा योजना सुरू केली. नव्या योजनेनुसार भरावा लागणारा हप्ता अत्यल्प असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे; पण योजनेत सहभागी झालेल्यांना मिळणारे नुकसान एक खासगी कंपनी देणार असल्याने त्या कंपनीच्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अर्जाकरिता शेतकरी भटकत असताना योजनेची अंतिम तारीख आली आहे. अर्जाची मागणी वाढत असल्याने शासनाच्यावतीने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण ही मुदतवाढ शेतकऱ्यांच्या मागणीवरून नाही तर बँकांच्या संपामुळे देण्यात आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेची अंतिम तारीख आता २ आॅगस्ट करण्यात आली. असे असले तरी योजनेतील अटी व नियम दरदिवशी बदलत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आधी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच वेगळी कार्यवाही करण्याची गरज नव्हती. कर्जाच्या हप्त्यातून बँक पीक विमा योजनेचा हप्ता कापून घेत होते. यावर्षी याशिवाय ज्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना पंचायत समितीकडून ठरविलेला अर्ज भरून तो बँकेत जमा करणे आवश्यक केले. त्यानुसार सदर अर्ज मिळवून तो भरून बँकेत जमा केला. अशात कृषी सहायकांनी जी कंपनी विम्याचा लाभ देणार आहे, त्या कंपनीने योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याद्वारे नियोजित केलेला अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना कळविले. नुकसान भरपाई देणारी कंपनी पिकांची पाहणी सॅटेलाईटद्वारे करून नुकसानीचा निर्णय घेणार आहे. शासनाने योजनेबाबत प्रसिद्धी केल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होत आहे. अशात कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यावर खरच नुकसान भरपाई मिळेल की शेतकऱ्यांना लुटण्याचाच हा प्रकार आहे, अशी चर्चा असली तरी योजनेत सहभागी होणाऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. शेतकऱ्यांवर कृषी सहायकाच्या मागे धावण्याची वेळ शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेल्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सदर अर्ज कृषी सहाय्यकाजवळ उपलब्ध असून तो मिळविणे शेतकऱ्यांसाठी कटकटीचे झाले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशा व्यस्त कालावधीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.