शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: July 31, 2016 00:39 IST

नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

फणिंद्र रघाटाटे वर्धा नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी यात असलेल्या जाचक अटी रद्द करून नव्याने सुधारित पीक विमा योजना सुरू केली. नव्या योजनेनुसार भरावा लागणारा हप्ता अत्यल्प असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे; पण योजनेत सहभागी झालेल्यांना मिळणारे नुकसान एक खासगी कंपनी देणार असल्याने त्या कंपनीच्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अर्जाकरिता शेतकरी भटकत असताना योजनेची अंतिम तारीख आली आहे. अर्जाची मागणी वाढत असल्याने शासनाच्यावतीने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण ही मुदतवाढ शेतकऱ्यांच्या मागणीवरून नाही तर बँकांच्या संपामुळे देण्यात आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेची अंतिम तारीख आता २ आॅगस्ट करण्यात आली. असे असले तरी योजनेतील अटी व नियम दरदिवशी बदलत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आधी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच वेगळी कार्यवाही करण्याची गरज नव्हती. कर्जाच्या हप्त्यातून बँक पीक विमा योजनेचा हप्ता कापून घेत होते. यावर्षी याशिवाय ज्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना पंचायत समितीकडून ठरविलेला अर्ज भरून तो बँकेत जमा करणे आवश्यक केले. त्यानुसार सदर अर्ज मिळवून तो भरून बँकेत जमा केला. अशात कृषी सहायकांनी जी कंपनी विम्याचा लाभ देणार आहे, त्या कंपनीने योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याद्वारे नियोजित केलेला अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना कळविले. नुकसान भरपाई देणारी कंपनी पिकांची पाहणी सॅटेलाईटद्वारे करून नुकसानीचा निर्णय घेणार आहे. शासनाने योजनेबाबत प्रसिद्धी केल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होत आहे. अशात कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यावर खरच नुकसान भरपाई मिळेल की शेतकऱ्यांना लुटण्याचाच हा प्रकार आहे, अशी चर्चा असली तरी योजनेत सहभागी होणाऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. शेतकऱ्यांवर कृषी सहायकाच्या मागे धावण्याची वेळ शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेल्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सदर अर्ज कृषी सहाय्यकाजवळ उपलब्ध असून तो मिळविणे शेतकऱ्यांसाठी कटकटीचे झाले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशा व्यस्त कालावधीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.