शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांनो, उमेद कायम ठेवा!

By admin | Updated: February 20, 2016 02:59 IST

शेतकऱ्यांना अनंत यातना सहन करून शेती करावी लागते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हाती येण्याची शक्यता कमीच असते.

शेतकऱ्यांशी साधला ज्येष्ठ नागरिकांनी संवादवर्धा : शेतकऱ्यांना अनंत यातना सहन करून शेती करावी लागते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हाती येण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आयुष्य तर जगावेच लागते. कितीही संकटे आल्यास हताश होऊ नका, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेख हाशम यांनी केले. आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराच्यावतीने महाकाळ येथे गावकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधारवड परिवार या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येता. याच उपक्रमाचा भाग म्हणून हा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रभाकर पाटील, जलतरणपटू गिरीश उपाध्याय, अ‍ॅड. अशोक वाघ, कामगार नेते गुणवंत डकरे, विनायक बोरसे, परिवाराचे अध्यक्ष श्यामकांत देशपांडे उपस्थित होते. बदलत्या आर्थिक धोरणांमुळे गावखेडी भकास होत आहेत. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे अन्य साधन नसल्याने युवक निराश झाले आहेत. सध्या स्मार्ट सीटी या विकास संकल्पना माध्यमांमधून पुढे रेटल्या जात आहे. याचे खरे स्वरूप कसे राहील. याबाबत मतभिन्नता आहे. मात्र हा देश कृषिप्रधान असल्याने स्मार्ट व्हिलेजला आधी प्राधान्य दिले पाहिजे. कारण गावे जगतील तरच शहरे जगतील, अन्यथा नव्या विकास संकल्पनांना काहीच अर्थ उरणार नाही. भारताचा विकास करण्यासाठी गाव हाच केंद्रबिंदू असला पाहिजे, असेही हाशम पुढे म्हणाले. आधारवड परिवाराच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावागावात भेटी देण्यात येत आहे. शिक्षणातून व्यक्तिमत्व विकासासोबतच स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण कसे देता येईल. याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हित लक्षात घेऊन काही नव्या उपक्रमांची आखणी करण्यात येईल, अशी माहिती श्यामकांत देशपांडे यांनी दिली. शेतीचा व्यवसाय संकटात आल्याने शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले. ज्येष्ठ नागरिकांनी शेतकऱ्यांंना मदत करण्यासाठी वेळा काढावा. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यावे, असे आवाहन केले. प्रभाकर पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचे वाचन करण्याची प्रेरणा दिली. गिरीश उपाध्याय, गुणवंत डकरे यांनीही शेतीप्रश्नांची माहिती जाणून घेतली. तसेच शासकीय योजनांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन केले. यावेळी सभेला उपस्थितांनी त्यांच्या समस्या मांडल्या. आयोजनासाठी प्रभाकर लिखितकर, सरपंच पुरुषोत्तम टोणपे आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)गावखेड्यांत विकासाचा अभावशहरात राहणाऱ्या नागरिकांना गावखेड्यांतील समस्यांची जाणीव नाही. प्रचंड संकटे सहन करून गावकरी आयुष्याचे दिवस पुढे ढकलतात. विकासाच्या शहरी गप्पा गावकऱ्यांच्या दृष्टीने पोकळ ठरल्या असून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, असे निरीक्षण आधारवडच्या सदस्यांनी नोंदविले. शासनाने विकासाचे नियोजन करताना गावकऱ्यांशी सुसंवाद साधावा अन्यथा या योजनांना अर्थ उरणार नाही, असे मत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.