शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षित भावामुळे तीळ पेऱ्याकडे शेतकऱ्यांचा वाढला कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:19 IST

Wardha : तिळाचा काढणीचा हंगाम मे महिण्यात येत असतो. त्यानंतर खरीपाचे शेतकरी पीक घेतो.

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शेती परवडत नाही अशी सारखी ओरड आता सर्व स्तरांवर होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात तीळ पेरा नसल्या जमा होता. मात्र, आता काही शेतकरी उन्हाळी तिळाकडे वळल्याने आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी दिसून येत आहे. रब्बीतच त्याची तयारी व नियोजनही करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तिळाची फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात पेरणी करावी लागते. यासाठी जमीन चांगली वखरून भुसभुशीत केल्यास पेरणी आणि उगवण क्षमता चांगली राहते. हेक्टरी चार किलो तीळ आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. तिफण, सरते वा ट्रॅक्टरच्या माध्यमातून पेरणी केली जाते. पण बरेचदा तीळ बारीक असल्याने तिफन वा सरत्यांनी पेरताना बारीक वाळू वा राख यांचा सुद्धा उपयोग करतात. खतांची मात्रा सुद्धा दिली जाते. काही शेतकरी शेणखताचा वापरही करतात. पेरणीपूर्वी नंतर बारा-पंधरा दिवसांनंतर पाणी देणे तसेच फुलांवर आल्यावर गरजेनुसार पाणी देणे वाढीसाठी आणि भरण्यासाठी पोषक ठरते. डवरणी निंदाई आंतरमशागत म्हणून केली जाते.

फवारणी केल्यास रोगांवर नियंत्रण मिळणे शक्यउन्हाळ्यात शेतकरी जास्त पीके घेत नसल्यामुळे तिळावर मावा, तुडतुडे, पाने खाणारी अळी आदी प्रकारचे रोग येत असतात. या रोगांचा परिणाम उत्पादनावर पडत असतो. मात्र, यावर वेळीच मार्गदर्शन घेऊन फवारणी केल्या रोगावर नियंत्रण मिळु शकते.

"मी तीन वर्षांपासून तीळ पीक घेत आहे. शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मागच्या वेळी दोन एकरात सहा क्विंटल झाले भाव ११ हजार रुपये क्विंटल मिळाला. यावेळी सुद्धा तयारी सुरू आहे."- रामेश्वर अमनेरकर, हमदापूर

टॅग्स :farmingशेतीwardha-acवर्धा