शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

जिल्हा बँकेत ठेवी अडकल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: May 10, 2014 00:29 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत ...

 वर्र्धा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या ठेविदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे यांनी सेलू तालुक्यातील महाबळा, इटाळा, आजनगाव येथील ग्रामस्थांच्या सभामध्ये केले. यावेळी माहिती देताना अविनाश काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या मदतीसाठी किसान अधिकार अभियानाने मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देवून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाात सहकार्याची हमी दिली होती. त्यानंतर वर्तमान संचालक मंडळाने राजीनामे दिले व शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली. सद्या प्रकरण प्रलंबित असून मोठ्या प्रमाणात ठेविदार तक्रारी नोंदवत आहेत. या गरजू ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे आंदोलन उभारण्याची गरज अविनाश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली. किसान अधिकारचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार म्हणाले, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही नेता पुढाकार घ्यायला घेताना दिसत नाही. त्यामुळे आता आपल्या प्रश्नासाथी स्वत:च जागरूक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वर्धा तालुका अध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. सभेचे आयोजन तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ता विठ्ठल गुजरकर व प्रभाकर बजाईत यांनी केले. मोठ्या प्रमाणात ठेविदार नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा यावेळी वाचला. यावेळी मनोहर महाकाळकर, भुजंग हाडके, सकु पंढरी, सिंध कावलकर, कमला कावलकर, कमला तेलरांधे, मनोज झाडे, अमीर उमाटे, देवराव बजाईत, नथ्थू चांभारे देवराव भावरकर, उत्तम कांबळे, भीमराव तडस, वामन देशमुख, सुभाष गुंडे, केशाव चांभारे भगवान चांभारे, प्रमोद ढुमणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)