शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

जिल्हा बँकेत ठेवी अडकल्याने शेतकरी अडचणीत

By admin | Updated: May 10, 2014 00:29 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत ...

 वर्र्धा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या ठेविदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे यांनी सेलू तालुक्यातील महाबळा, इटाळा, आजनगाव येथील ग्रामस्थांच्या सभामध्ये केले. यावेळी माहिती देताना अविनाश काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या मदतीसाठी किसान अधिकार अभियानाने मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देवून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाात सहकार्याची हमी दिली होती. त्यानंतर वर्तमान संचालक मंडळाने राजीनामे दिले व शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली. सद्या प्रकरण प्रलंबित असून मोठ्या प्रमाणात ठेविदार तक्रारी नोंदवत आहेत. या गरजू ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे आंदोलन उभारण्याची गरज अविनाश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली. किसान अधिकारचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार म्हणाले, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही नेता पुढाकार घ्यायला घेताना दिसत नाही. त्यामुळे आता आपल्या प्रश्नासाथी स्वत:च जागरूक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वर्धा तालुका अध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. सभेचे आयोजन तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ता विठ्ठल गुजरकर व प्रभाकर बजाईत यांनी केले. मोठ्या प्रमाणात ठेविदार नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा यावेळी वाचला. यावेळी मनोहर महाकाळकर, भुजंग हाडके, सकु पंढरी, सिंध कावलकर, कमला कावलकर, कमला तेलरांधे, मनोज झाडे, अमीर उमाटे, देवराव बजाईत, नथ्थू चांभारे देवराव भावरकर, उत्तम कांबळे, भीमराव तडस, वामन देशमुख, सुभाष गुंडे, केशाव चांभारे भगवान चांभारे, प्रमोद ढुमणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)