शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

नाफेडच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांसमोर पेच

By admin | Updated: June 23, 2014 00:14 IST

जगाचा पोशिंदा अशी ओळख असलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना कंटाळलेल्या शेतकऱ्याला आता शेतमाल कुठे विकावा,

वायगाव (नि़) : जगाचा पोशिंदा अशी ओळख असलेला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गत दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना कंटाळलेल्या शेतकऱ्याला आता शेतमाल कुठे विकावा, हा पेच पडला आहे़ बाजार समितीमध्ये व्यापारी लूट करतात आणि नाफेडची शासकीय खरेदी बंद झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे़ याकडे लक्ष देत नाफेडची खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे़ मागील वर्षी सोयाबीन काताना अवकाळी पावसाने हजेरी लावली़ यामुळे बहुतांश सोयाबीन खराब झाले़ डागी सोयाबीन शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावे लागले़ पाऊस समाधानकारक झाल्याने रबी हंगामात तोटा भरून काढता येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले; पण निसर्गाने दगा दिला. तोंडी आलेला घास हिसकावून घेतला. काही शेतकऱ्यांना हरभऱ्याची लागवड करताना चना विकून बियाणे, खतांची खरेदी करता येईल, असे वाटले होते; पण या आशेवरही पाणी फेरले़ चना व तूर खरेदीमध्ये बाजार समितीत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली़ यामुळे शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली़ यावरून नाफेडद्वारे चना, तुरीची खरेदी करण्यात आली; पण ही खरेदीही २४ मे पासून बंद करण्यात आली़ शासकीय खेरदी बंद झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला शेतमाल हमीभावापेक्षाही कमी दराने व्यापाऱ्याला विकावा लागत आहे़ यातही व्यापाऱ्यांनी ‘जमा खोरी कायदा १९५५’ चा धसका घेतल्याचे दिसते़ या कायद्यानुसार व्यापाऱ्यावर कारवाई होऊन दंड आकारला जातो व माल सिल केला जातो़ या कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही मंडीतून शेतमाल खरेदी बंद केली़ आता व्यापाऱ्यांची खरेदीही बंद आणि नाफेडही माल खरेदी करीत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत़ आता शेतकऱ्यांनी आपला शेतमाल कुठे विकायचा, हा प्रश्नच आहे़ बाजार समिती व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजचे झाले आहे़(वार्ताहर)