शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
5
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
6
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
7
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
8
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
10
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
11
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
12
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
13
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
18
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
19
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
20
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?

उपनिबंधकांना शेतकऱ्यांचा घेराव

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

शेतकऱ्यांच्या कापसाची रक्कम घेवून पसार झालेला सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचा संचालक सुनील टालाटुले याचे प्रकरण मुंबईत पोहोचले.

सिंदी कृऊबा समितीतील प्रकरण : सचिवावर कारवाईची मागणी वर्धा : शेतकऱ्यांच्या कापसाची रक्कम घेवून पसार झालेला सेलू येथील श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगचा संचालक सुनील टालाटुले याचे प्रकरण मुंबईत पोहोचले. दिल्ली व नागपुरात आंदोलन झाले. असे असताना या समितीचा सचीव गुन्हे दाखल असतानाही समितीत कार्यरत आहे. शिवाय त्याच्या वैयक्तीक प्रकरणात तो बाजार समितीची रक्कम वापरत आहे, असे अनेक आरोप करीत अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसच्यावतीने शनिवारी येथील जिल्हा उपनिंबधक कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती, उपबाजारपेठ सेलू येथे ४०० शेतकऱ्यांची कापूस व्यापारी सुनील टालाटुले याने फसवणूक केली. त्यासंदर्भात सेलू पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार टालाटुले व प्रशासक तलमले आणि सचिव आय.आय.सुफीवर भादंविच्या कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे उपनिबंधक कार्यालयातर्फे लवाद या न्यायाधिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून सुनील टालाटुले आणि सुुफी या दोेघांच्याही संगणमताने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे निकालात स्पष्ट झाले. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. भारतीय दंड विधान ४२० मध्ये सात दिवस पोलीस व न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर सुद्धा सचिवावर निलंबनाची कारवार्ई झालेली नाही. उपनिबंधक कार्यालयाकडूनही यात कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी घेराव घालताना केला. सचिवावर कारवाई संदर्भात समितीला कळवू - ए.बी. कडूशेतकरी प्रतिनिधी निवेदन घेवून आले. त्यांच्या म्हणण्यानुसार बाजार समितीचे सचिव त्याच्या वैयक्तीक न्यायालयीन प्रकरणात समितीची रक्कम वापरत आहे. या बाबत चौकशी करण्यात येईल. तसेच गुन्हा दाखल असताना अटक करण्यात आलेला समितीचा सचीव पुन्हा कार्यरत होत असल्याचा आरोपही आहे. याही बाबात चौकशी करण्यात येईल. मुंबई येथील बैठकीत झालेले निर्णय अद्याप कळविण्यात आलेले नाही. येत्या दिवसात ते कार्यालयाला प्राप्त होतील. त्यात दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाहीची दिशा ठरविण्यात येईल. बाजार समितीचे अंकेक्षण सुरू आहे. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर कलम ४० अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना बाजार समितीला देण्यात येईल. शासनाने या प्रकरणात आरोपीची संपत्ती लिलावात काढण्याच्या सूचना केल्या आहेत. ही कारवाई झाल्यास शेतकऱ्यांना त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वळती करण्याची कार्यवाही होवू शकते, असे उपनिबंधक ए.बी. कडू म्हणाले. शासनाचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - अविनाश काकडेसिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रकरणात आरोपीला पाठीशी घालण्याचे काम शासकीय यंत्रणेकडून सुरू आहे. यात भाजपाच्यावतीने अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात येत आहे. एक कर्मचारी आठ दिवस कारागृहात राहून बाहेर आल्यावर पुन्हा त्या खुर्चीवर बसून न्यायाधीशाचे काम करतो, असे होवू शकते काय. या बाबत उपनिबंधकांना विचारणा केली असता त्यांच्याकडून नियमाची पाहणी करण्याचे बोलले जाते. यातूनच सदर प्रकार दडपण्याचा शासनाचा प्रयत्न उघड होत असल्याचे अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अविनाश काकडे यावेळी म्हणाले.