शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:28 IST

देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभºयात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन, कृषी विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभऱ्यात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे. त्यामुळे जगाची भूक भागविण्याची ताकद केवळ भारत देशात आहे. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना पाहिजे तशी मदत दिली जात नव्हती. मात्र, आमच्या सरकारने मागील चार वर्षांत शेतकऱ्यांना चांगली मदत दिली आहे. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचाच पहिला हक्क असून त्या दिशेने सरकार काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.कृषी विभागाच्यावतीने पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. रामदास आंबटकर, जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. सभापती मुकेश भिसे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे, जिल्हा कृषी अधीक्षक विद्या मानकर आदींची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, वर्धेतील सीताफळ अंबानीच्या घरात जाणे ही कौतुकाची बाब आहे. तलाठ्याची शासकीय नोकरी सोडून शेतीतून आपला विकास साधणाºया एका शेतकऱ्यांला आपण आज गौरविले. वास्तविक पाहता हे उदाहरण म्हणजे अंधकारमय व्यवसाय म्हणून बघितल्या जाणाऱ्या शेती या व्यवसायात एक प्रकाशाची किरण ठरणारा आहे. मातीची सेवा केल्याशिवाय सोन उगवू शकत नाही. शेतकºयांनीही मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करून भरघोस उत्पन्न घेण्यापेक्षा सेंद्रीय शेती केली पाहिजे. कारण सेंद्रीय शेती करताना जमिनीची पोत घसरत नाही. जे विकते तेच शेतकऱ्यांनी पिकविले पाहिजे. कृषी विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी धनप्राप्तीचा पर्व व्हावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विद्या मानकर यांनी केले.शेतमाल निर्यातीवर भर द्या -रामदास तडसविदर्भातील अनेक प्रकल्प पूर्ण न झाल्याने येथील शेतकरी देशोधडीला लागला आहे. निसर्ग कोपन आणि शेतकरी झोपन अशी स्थिती विदर्भाची आहे. येथील शेतमाल थेट निर्यात झाल्यास त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होईल. वर्धा लोकसभा क्षेत्रात १४ प्रकल्प आहे; पण ती अपूर्ण आहेत. भाजप सरकार ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. इतकेच नव्हे तर पूर्वी केवळ एक केंद्रीय महामार्ग वर्धा लोकसभा मतदार संघात होता. तर आता वर्धा लोकसभा क्षेत्रात ती संख्या ९ झाली असल्याचे यावेळी मार्गदर्शन करताना खा. रामदास तडस यांनी सांगितले. सरकारने शेतमाल निर्यातीवर भर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.या शेतकऱ्यांचा झाला गौरवफळबाग शेती करून सीताफळ व केळीचे विक्रमी उत्पन्न घेतल्या बद्दल समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव येथील सुरेश पाटील, वर्धा तालुक्यातील पवनार येथील कुंदन वाघमारे, हिंगणघाट तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी रतनलाल बोरकर यांना ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच जया चंद्रकांत उघडे, सुधाकर पुंडलिक शेंडे, गोपाल अशोक वाघमारे, सविता येळणे, श्रीकांत अंबादास तोटे, महेश मुधोळकर व नरेश काळपांडे या शेतकऱ्यांचाही सत्कार ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.साहेब, सफरचंद नव्हे बोर!वर्धा : कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम ना. सुधीर मुनगंटीवार, खा. रामदास तडस, आ. पंकज भोयर, आ. रामदास आंबटकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी मान्यवरांनी महोत्सवात असलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार कृषी विकास अधिकारी जि.प. वर्धाच्यावतीने लावण्यात आलेल्या एका स्टॉलवर थांबले. त्यांनी एक फळ हाती घेत हे कुठले फळ आहे. सफरचंद काय? असा प्रश्न तेथील अधिकाऱ्याला केला. त्यावर कृषी अधिकारी मनोज नागपूरकर यांनी साहेब हे सफरचंद नाही, अ‍ॅपल बोर आहे, असे सांगितले. त्यानंतर ना. सुधीर मुनगंटीवार यांना त्या बोराचे छायाचित्र काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढून स्टॉलवर असलेल्या अ‍ॅपल बोराचे छायाचित्र कॅमेराबद्ध केले, हे विशेष.कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती गंभीर राहावे -पंकज भोयरवर्ध्यातील सीताफळ मुकेश अंबानी खरेदी करतात हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह कृषी विभागालाही माहिती नाही. ही खरच खेदाची बाब आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांप्रती गंभीर राहावे, असे यावेळी आ. डॉ. पंकज भोयर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.नुकसान भरपाईसाठीचा नवा कायदा सरकारच्या विचाराधीनवन्य प्राण्यांकडून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. परंतु, नुकसान भरपाईही वेळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नाही.नुकसानग्रस्ताला अवघ्या १५ दिवसात शासकीय मदत मिळावी. तसेच विलंब झाल्यास त्यांना व्याजासकट नुकसान भरपाई मिळावी यासाठीचा कायदा आम्ही तयार करीत असल्याचे याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagricultureशेती