शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आर्थिक पेचात

By admin | Updated: May 31, 2014 23:42 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरिपाची तयारी : वाढत असलेल्या बियाण्यांच्या किमतीमुळेघोराड :  खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.विविध कंपन्यांनी १८ किलो, २५ किलो, २७ किलो, २0 किलो व ३0 किलोची सोयाबीन बियाण्याची बॅग कृषी केंद्रामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या बियाण्याची किंमत कंपनीने ठरविल्यानुसार ८६ ते १0४ रुपये किलो चा भावाने शेतकर्‍यांना घ्यावी लागत आहे. शेतकर्‍यांनी ज्यावेळी सोयाबीन बाजारपेठेत सुरुवातीस विक्रीस नेले त्यावेळी ३२00 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. जेव्हा बाजारपेठेत सोयाबीन अत्यल्प प्रमाणात विक्रीस आली तेव्हा ४७00 रुपये भावाने व्यापार्‍यांनी खरेदी केली पण जेव्हा बियाणे खरेदीची वेळ आली तेव्हा आता  असलेले भाव पाहून शेतकरी अवाक होत आहे. वाढलेले भाव पाहता सोयाबीनचे उत्पादन न घेता कपाशीचे पीक घ्यावे का असा विचार शेतकरी करीत असताना दिसत आहे. पण या पिकाला येणारा  खर्च कसा करावा या विवंचनेत शेतकरी असल्याने बियाणे महाग असले तरी ते घ्यावेच लागणार असाही विचार त्याच्या मनात येत आहे. पण तुर्तास तरी शेतकरी आर्थिक बजेट आखत आहे. दरवर्षी सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांजवळ राहत होते. यावर्षी सोयाबीनच्या मळणीच्या वेळी सातत्याने पाऊस आल्याने सोयाबीन ओलीचिंब झाले. त्यामुळे शेतकर्‍याजवळ घरगुती बियाणे नाही. शेतकर्‍यांची सोयाबीन पावसात सापडली मग कंपन्यांनी पिकविलेली सोयाबीन पावसात भिजली नसेल का असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे. विविध कंपण्याच्या बियाण्याच्या उगवण शक्तीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पारंपरिक शेती उद्योग या महागाईमुळे अडचणीचा ठरू पाहत आहे.(वार्ताहर)