खरिपाची तयारी : वाढत असलेल्या बियाण्यांच्या किमतीमुळेघोराड : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.विविध कंपन्यांनी १८ किलो, २५ किलो, २७ किलो, २0 किलो व ३0 किलोची सोयाबीन बियाण्याची बॅग कृषी केंद्रामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या बियाण्याची किंमत कंपनीने ठरविल्यानुसार ८६ ते १0४ रुपये किलो चा भावाने शेतकर्यांना घ्यावी लागत आहे. शेतकर्यांनी ज्यावेळी सोयाबीन बाजारपेठेत सुरुवातीस विक्रीस नेले त्यावेळी ३२00 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. जेव्हा बाजारपेठेत सोयाबीन अत्यल्प प्रमाणात विक्रीस आली तेव्हा ४७00 रुपये भावाने व्यापार्यांनी खरेदी केली पण जेव्हा बियाणे खरेदीची वेळ आली तेव्हा आता असलेले भाव पाहून शेतकरी अवाक होत आहे. वाढलेले भाव पाहता सोयाबीनचे उत्पादन न घेता कपाशीचे पीक घ्यावे का असा विचार शेतकरी करीत असताना दिसत आहे. पण या पिकाला येणारा खर्च कसा करावा या विवंचनेत शेतकरी असल्याने बियाणे महाग असले तरी ते घ्यावेच लागणार असाही विचार त्याच्या मनात येत आहे. पण तुर्तास तरी शेतकरी आर्थिक बजेट आखत आहे. दरवर्षी सोयाबीनचे बियाणे शेतकर्यांजवळ राहत होते. यावर्षी सोयाबीनच्या मळणीच्या वेळी सातत्याने पाऊस आल्याने सोयाबीन ओलीचिंब झाले. त्यामुळे शेतकर्याजवळ घरगुती बियाणे नाही. शेतकर्यांची सोयाबीन पावसात सापडली मग कंपन्यांनी पिकविलेली सोयाबीन पावसात भिजली नसेल का असा प्रश्न शेतकर्यांना पडत आहे. विविध कंपण्याच्या बियाण्याच्या उगवण शक्तीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पारंपरिक शेती उद्योग या महागाईमुळे अडचणीचा ठरू पाहत आहे.(वार्ताहर)
शेतकरी आर्थिक पेचात
By admin | Updated: May 31, 2014 23:42 IST