शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

शेतकरी आर्थिक पेचात

By admin | Updated: May 31, 2014 23:42 IST

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

खरिपाची तयारी : वाढत असलेल्या बियाण्यांच्या किमतीमुळेघोराड :  खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकर्‍यांनी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पण बियाण्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.विविध कंपन्यांनी १८ किलो, २५ किलो, २७ किलो, २0 किलो व ३0 किलोची सोयाबीन बियाण्याची बॅग कृषी केंद्रामध्ये विक्रीस उपलब्ध आहे. या बियाण्याची किंमत कंपनीने ठरविल्यानुसार ८६ ते १0४ रुपये किलो चा भावाने शेतकर्‍यांना घ्यावी लागत आहे. शेतकर्‍यांनी ज्यावेळी सोयाबीन बाजारपेठेत सुरुवातीस विक्रीस नेले त्यावेळी ३२00 रुपये क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. जेव्हा बाजारपेठेत सोयाबीन अत्यल्प प्रमाणात विक्रीस आली तेव्हा ४७00 रुपये भावाने व्यापार्‍यांनी खरेदी केली पण जेव्हा बियाणे खरेदीची वेळ आली तेव्हा आता  असलेले भाव पाहून शेतकरी अवाक होत आहे. वाढलेले भाव पाहता सोयाबीनचे उत्पादन न घेता कपाशीचे पीक घ्यावे का असा विचार शेतकरी करीत असताना दिसत आहे. पण या पिकाला येणारा  खर्च कसा करावा या विवंचनेत शेतकरी असल्याने बियाणे महाग असले तरी ते घ्यावेच लागणार असाही विचार त्याच्या मनात येत आहे. पण तुर्तास तरी शेतकरी आर्थिक बजेट आखत आहे. दरवर्षी सोयाबीनचे बियाणे शेतकर्‍यांजवळ राहत होते. यावर्षी सोयाबीनच्या मळणीच्या वेळी सातत्याने पाऊस आल्याने सोयाबीन ओलीचिंब झाले. त्यामुळे शेतकर्‍याजवळ घरगुती बियाणे नाही. शेतकर्‍यांची सोयाबीन पावसात सापडली मग कंपन्यांनी पिकविलेली सोयाबीन पावसात भिजली नसेल का असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे. विविध कंपण्याच्या बियाण्याच्या उगवण शक्तीवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पारंपरिक शेती उद्योग या महागाईमुळे अडचणीचा ठरू पाहत आहे.(वार्ताहर)