शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

दुधडेअरी प्रकल्पाच्या अनुदानाकरिता शेतकर्‍याची फरफट

By admin | Updated: May 17, 2014 23:49 IST

केंद्र व राज्य शासनाने शेतीला जोडधंद्या म्हणून शेकडो योजनांवर अनुदान वाटप सुरू केले़ या योजनांतर्गत प्रकल्प मंजूर झाल्यावर मात्र अनुदान काढून देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे.

आष्टी (श.) : केंद्र व राज्य शासनाने शेतीला जोडधंद्या म्हणून शेकडो योजनांवर अनुदान वाटप सुरू केले़ या योजनांतर्गत प्रकल्प मंजूर झाल्यावर मात्र अनुदान काढून देण्यास टाळटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत येथील एका शेतकर्‍याने विभागीय कृषी सहसंचालक नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली. या तक्रारीत संबंधीत अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे़ प्राप्त महितीनुसार, येथील अल्पभूधारक प्रगतीशील शेतकरी अण्णाजी राणे यांच्याकडे चार एकर शेती आहे़ शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी १२ म्हशी विकत घेवून दुग्धव्यवसाय सुरू केला़ घरच्या म्हशी असल्याने ३०० लिटर दूध दररोज विकायला नेण्याऐवजी त्यांनी स्वत:च दुधडेअरी सुरू करण्याला निर्णय घेतला. त्यासाठी सन २०११ मध्ये महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत पाच लाख रुपये मंजूर झाले़ शासकीय नियमाप्रमाणे दुधडेअरीचे बांधकाम केले़ डेअरीमध्ये खवा, पनीर, तुप व सर्व स्निग्ध पदार्थ तयार करण्याच्या मशीन आणल्या़ या पाच लाखांच्या प्रकल्पात अडीच लाख बँकेचे कर्ज तर अडीच लाख अनुदान आहे़ यातील अडीच लाखांपैकी सव्वा लाखांचे अनुदान तत्कालीन तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे यांनी काढून दिले. यातील उर्वरीत सव्वा लाखांचे अनुदान काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी डॉ़ योगीराज जुमडे यांच्याकडे अर्ज सादर केला़ त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून बटर चर्नर यंत्र कमी असल्याने अहवालात नमूद केले़ त्यानंतर शेतकरी राणे यांनी संबंधीत एजंसीकडून यंत्र आणले़ याची माहिती कृषी अधिकारी जुमडे यांना दिली़ सोबतच उपविभागीय कृषी अधिकारी अरुण बलसाणे यांनाही त्याची कल्पना दिली़ त्रुटीची पूर्तता केल्यावर अनुदान निघणे अपेक्षीत होते; परंतु संबंधीत तालुका कृषी अधिकार्‍यांनी यंत्राचे बील नव्याने देण्याचे फर्मान सोडले़ कोटेशन व अंतिम बील एकदाच मिळत असल्यामुळे शेतकरी राणे यांनी दुसरे बील आणल्यास मुल्यवर्धीत कर (व्हॅट) परत भरावा लागेल, असे सांगितले़ तरीसुद्धा शेतकर्‍यांची बाजू न ऐकता प्रकल्पच रद्द करण्याचे पत्र सदर अधिकार्‍यांनी पाठविले़ याप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बºहाटे यांच्याकडे निवेदन सादर करून अनुदान काढण्याची मागणी केली़ अनुदान काढण्यासंबंधीचा प्रस्ताव उपविभागीय कृषी अधिकार्‍यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला़ याला महिन्याचा कालावधी लोटूनही अनुदान निघाले नाही़ याबाबत शेतकरी अण्णाजी राणे यांनी जिल्हा अधीक्षक बºहाटे यांना विचारणा केली असता तुमचे अनुदान का निघाले नाही़, हे तुम्हाला माहिती असे बोलून दिशाभूल केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे़ या प्रकरणाची तक्रार निवेदनाद्वारे विभागीय कृषी सहसंचालक नागपूर कार्यालयाकडे केली आहे़(प्रतिनिधी)