शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

निसर्ग कोपानंतर आता महावितरणचा शेतकऱ्यांवर कोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 18:23 IST

महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देरात्रभर करावी लागतेय ओलीत : वीजपुरवठ्याचे नियम बदलल्याने अडचण

वर्धा : खरीप हंगामातील पीक गेल्याने रब्बी हंगामाची आशा बाळगून असलेले शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागलेले असताना दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांना रात्रभर ओलीत करावी लागत आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर काम करून थकल्यानंतर ओलितासाठी जागावे लागत आहे.

कारंजा (घाडगे) तालुक्यात सतत दुसऱ्या वर्षी भयंकर दुष्काळाचे सावट पसरले असून, सततच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन देखील होणे कठीणच झाले आहे. तसेच कपाशीचे पीक लाल पडले असून लागलेला खर्च तरी निघेल या अपेक्षेने रात्रभर ओलीत करून कापूस जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यातच महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरण शेतकऱ्यांवर कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहे.

मागील वर्षी रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरवठा होत होता. तेव्हा सकाळचे दोन तास तरी मिळत होते. यावर्षी महावितरणने वीजपुरवठ्याचा नियम बदलविल्याने अख्खी रात्रच शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यामुळे रात्रीच वीजपुरवठा करायचा असेल तर मागील वर्षीप्रमाणे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही बाब कशी लक्षात येत नाही. हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा महावितरणने अंत पाहू नये, अन्यथा फार मोठे दुष्परिणाम महावितरणला भोगावे लागतील. मागील वर्षीप्रमाणे वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

हरिचंद चौधरी, शेतकरी, बोंदरठाणा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजGovernmentसरकार