शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

निसर्ग कोपानंतर आता महावितरणचा शेतकऱ्यांवर कोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 18:23 IST

महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देरात्रभर करावी लागतेय ओलीत : वीजपुरवठ्याचे नियम बदलल्याने अडचण

वर्धा : खरीप हंगामातील पीक गेल्याने रब्बी हंगामाची आशा बाळगून असलेले शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागलेले असताना दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांना रात्रभर ओलीत करावी लागत आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर काम करून थकल्यानंतर ओलितासाठी जागावे लागत आहे.

कारंजा (घाडगे) तालुक्यात सतत दुसऱ्या वर्षी भयंकर दुष्काळाचे सावट पसरले असून, सततच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन देखील होणे कठीणच झाले आहे. तसेच कपाशीचे पीक लाल पडले असून लागलेला खर्च तरी निघेल या अपेक्षेने रात्रभर ओलीत करून कापूस जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यातच महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरण शेतकऱ्यांवर कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहे.

मागील वर्षी रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरवठा होत होता. तेव्हा सकाळचे दोन तास तरी मिळत होते. यावर्षी महावितरणने वीजपुरवठ्याचा नियम बदलविल्याने अख्खी रात्रच शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यामुळे रात्रीच वीजपुरवठा करायचा असेल तर मागील वर्षीप्रमाणे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही बाब कशी लक्षात येत नाही. हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा महावितरणने अंत पाहू नये, अन्यथा फार मोठे दुष्परिणाम महावितरणला भोगावे लागतील. मागील वर्षीप्रमाणे वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

हरिचंद चौधरी, शेतकरी, बोंदरठाणा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजGovernmentसरकार