शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

निसर्ग कोपानंतर आता महावितरणचा शेतकऱ्यांवर कोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 18:23 IST

महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरणही कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देरात्रभर करावी लागतेय ओलीत : वीजपुरवठ्याचे नियम बदलल्याने अडचण

वर्धा : खरीप हंगामातील पीक गेल्याने रब्बी हंगामाची आशा बाळगून असलेले शेतकरी रब्बी पिकांच्या तयारीला लागलेले असताना दिवसभर काम करून थकलेल्या शेतकऱ्यांना रात्रभर ओलीत करावी लागत आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर काम करून थकल्यानंतर ओलितासाठी जागावे लागत आहे.

कारंजा (घाडगे) तालुक्यात सतत दुसऱ्या वर्षी भयंकर दुष्काळाचे सावट पसरले असून, सततच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन देखील होणे कठीणच झाले आहे. तसेच कपाशीचे पीक लाल पडले असून लागलेला खर्च तरी निघेल या अपेक्षेने रात्रभर ओलीत करून कापूस जगविण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यातच महावितरणने वीजपुरवठ्याच्या नियमात बदल केला. त्यामुळे, शेतकऱ्याला दिवसभर काम करून रात्री १० ते पहटे ६ या वेळातही राबावे लागत आहे. निर्सगानंतर आता महावितरण शेतकऱ्यांवर कोपल्याने शेतकऱ्यांवर संकटाचे ढग निर्माण झाले आहे.

मागील वर्षी रात्री बारा ते सकाळी आठ वाजेपर्यंत पुरवठा होत होता. तेव्हा सकाळचे दोन तास तरी मिळत होते. यावर्षी महावितरणने वीजपुरवठ्याचा नियम बदलविल्याने अख्खी रात्रच शेतकऱ्यांना अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाला असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, त्यामुळे रात्रीच वीजपुरवठा करायचा असेल तर मागील वर्षीप्रमाणे करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना अनेक आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही बाब कशी लक्षात येत नाही. हे कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांचा महावितरणने अंत पाहू नये, अन्यथा फार मोठे दुष्परिणाम महावितरणला भोगावे लागतील. मागील वर्षीप्रमाणे वीजपुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

हरिचंद चौधरी, शेतकरी, बोंदरठाणा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीelectricityवीजGovernmentसरकार