शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

खासगी कापूस खरेदीत शेतकऱ्यांना थेट हजाराचा फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 17:13 IST

Wardha News Cotton सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसलाआहे. 

ठळक मुद्देविदर्भात सीसीआय व पणनची खरेदी लांबलीव्यापाऱ्यांच्या केंद्रावर उसळतेय गर्दी

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भातील शेतकऱ्याचे नगदी पीक असलेल्या कापसाची शासकीय स्तरावर सीसीआय व कापूस पणन महासंघ यांच्याकडून होणारी खरेदी लांबल्याने सध्या विदर्भात कापसाच्या मोठ्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार २०० रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली जात आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला असून यंदा सोयाबीनचे उत्पादन घटल्याने कापूस विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. 

राज्यात उत्पादित होणारा ७७ टक्के कापूस एकट्या विदर्भात पिकतो. नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. दसऱ्यानंतर कापूस निघण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या काॅटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)  व राज्य सरकारचे  कापूस पणन महासंघ यांनी विदर्भात खरेदी सुरू केलेली नाही. यांचे केंद्र निश्चित झाले असून  खरेदी दिवाळीनंतर सुरू होणार आहे. यंदा कीड व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन घटले. त्यामुळे अनेक शेतकरी आता निघालेला कापूस विकण्यासाठी बाजारात दाखल झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, वणी, वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर, हिंगणघाट, देवळी, आर्वी आदी ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली आहे. येथे कापसाला ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये क्विंटल भाव दिला जात आहे. केंद्र सरकारने यंदा कापसाला ५ हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, केंद्र सुरू केेले नसल्याने शेतकऱ्यांना  खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकताना क्विंटलमागे थेट १ हजार ते १ हजार २०० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

आर्द्रतेच्या मुद्यामुळे सीसीआयची खरेदी लांबलीविदर्भात सीसीआय मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करते. अकोला येथून सीसीआयचा सर्व कारभार चालविला जातो. मात्र, विदर्भात अवकाळी पाऊस झाल्याने कापसातील आर्द्रतेचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे, असे कारण देत सीसीआयने दसऱ्यानंतर सुरू होणारी कापूस खरेदी लांबणीवर टाकली आहे. यापूर्वीच सीसीआयने खरेदी केंद्राची निविदा प्रक्रीया पूर्ण केली आहे. अनेक बाजार समित्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण  केली आहे. सीसीआय १२ टक्क्यांपेक्षा कमी आर्द्रतेचा कापूस खरेदी करते. त्यामुळेच ते १२ टक्के आर्द्रता येण्याची प्रतीक्षा करीत असावे, असा जाणकारांचा अंदाज आहे.  

टॅग्स :cottonकापूस