शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

By admin | Updated: November 14, 2016 00:53 IST

हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे.

८० हजार १२५ प्रकरणे : ९७,०९३ हेक्टर क्षेत्राचा समावेशप्रशांत हेलोंडे  वर्धाहवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे. जिल्ह्यातील कर्जदार आणि गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा रिलायन्स या विमा कंपनीकडून काढला जात आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात सुमारे ५६ हजारांवर कर्जदार तर ५ हजार २८८ गैरकर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी तब्बल १४ कोटी ४८ लाख रुपयांचा पीक विमा काढलेला आहे. यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात नुकसान सहन करावे लागल्याने त्यांनी विमा परताव्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. विदर्भातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. काही वर्षांत सिंचन क्षेत्रात वाढ झाली असली तरी पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा शेतातील पिकांवर परिणाम होतो. यामुळेच शासनाकडून पीक विमा योजना राबविल्या जातात. पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना होती. आता पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना एकदाच विमा हप्ता भरावा लागतो. पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी विम्याच्या परताव्यासाठी प्रस्ताव सादर करता येतो. यासाठी कृषी विभागाच्यावतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हजेरीत सर्वेक्षण केले जाते. सदर प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्यास कृषी विभागाचे सर्वेक्षण ग्राह्य धरले जाते. या सुविधेमुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना तर पिकांचा विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण जिल्ह्यात गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही विमा उतरविल्याचे दिसून येत आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५६ हजारांवर शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी असल्याने एका शेतकऱ्याची दोन ते तीन वेळा नोंद होत असल्याचे लीड बँकेकडून सांगण्यात आले आहे. हा आकडा विचारात घेतला तर जिल्ह्यातील ९१ हजार ५९५.८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला आहे. यासाठी ७४ हजार ८३७ प्रकरणांमध्ये कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी १३ कोटी ७६ लाख, ४५ हजार ९४३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. गैरकर्जदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा योजनेचा लाभ घेतला आहे. यात ५ हजार २८८ शेतकऱ्यांनी आपल्या ५ हजार ४९७.७५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ७२ लाख १२ हजार ७१३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. एकूण जिल्ह्यातील ८० हजार १२५ प्रकरणांमध्ये १४ कोटी ४८ लाख ५८ हजार ६५६ रुपयांचा विमा हप्ता संबंधित कंपनीला अदा करण्यात आला आहे. विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाईची हमी मिळाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आणि शासकीय यंत्रणेने पंचनामाच केला नाही तर शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळणे कठीण होते. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्याकरिता कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपनीने पूढाकार घेत नुकसानाचा पंचनामा करून घेत सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.