शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर ...

ठळक मुद्देभूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे नेतृत्व : शेतकºयांचा चौरस मिटर प्रमाणे रक्कम द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर प्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सोमवारी विभागीय आयुक्त नागपूर संजीवकुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.यात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे. परंतु याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आयुक्ताना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेती संपादित करण्यात आल्यामुळे शेतकºयांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संषर्घ वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी केले. यावेळी शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अरविंद देशमुख, सतीश मेहत्रे, अविनाश कुबडे, चंद्रकांत मेहत्रे, धनंजय चरडे, किशोर मडावी, प्रताप चरडे, जगदीश बदरीया, भूजंग वाघ, निलेश वाघ, विनोद फटींग, लक्ष्मण बदरिया, अशोक रोडे, रमेश बदरिया, बाबाराव वांदीले, कुणाल देशमुख, दत्ता राऊत आदी उपस्थित होते.यावेळी निवेदन देताना अभिजित फाळके म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेच्या नाकाखाली नॅशनल हायवे जमीन अधिग्रहण प्रकरणात शेतकºयांचे शोषण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सर्र्व चौरस गुणकानुसार अधिग्रहणाचे काम झाले असताना येथे हेक्टरी मापाने अधिग्रहण का ? असा सवाल आहे.