शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आयुक्तांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर ...

ठळक मुद्देभूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे नेतृत्व : शेतकºयांचा चौरस मिटर प्रमाणे रक्कम द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित केलेल्या आणि होणाऱ्या जमिनीचा मोबदला चौरस मिटर प्रमाणे देण्यात यावा, अशी मागणी सालोड हिरापूर येथील शेतकऱ्यांसह भूमिपूत्र संघर्ष वाहिनीने सोमवारी विभागीय आयुक्त नागपूर संजीवकुमार यांची भेट घेवून त्यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.यात म्हटले आहे की, राष्ट्रीय राजमार्ग क्र. ३६१ मध्ये संपादित होणाऱ्या जमिनीचा दर मोबदल्याच्या स्वरूपात हेक्टर आर प्रमाणे देण्यात आलेला आहे. परंतु याच प्रकल्पासाठी संपूर्ण यवतमाळ, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नॅशनल हायवेज अ‍ॅक्ट १९५६ च्या तरतुदीनुसार चौरस मिटर व त्यावरील चार गुणक प्रमाणे मोबदला देण्यात आला आहे. याबाबत शेतकरी व भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आयुक्ताना यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका (भूसंपादन मामला क्र. ६/४७/२०१५-१६) येथील पारित करण्यात आलेला अंतिम निवाडा सादर केला आहे. वर्धा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. शेती संपादित करण्यात आल्यामुळे शेतकºयांचे रोजगाराचे साधन हिरावले जाणार आहे.या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संषर्घ वाहिनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके पाटील यांनी केले. यावेळी शेतकरी उदय देशमुख, संजय मेहत्रे, अरविंद देशमुख, सतीश मेहत्रे, अविनाश कुबडे, चंद्रकांत मेहत्रे, धनंजय चरडे, किशोर मडावी, प्रताप चरडे, जगदीश बदरीया, भूजंग वाघ, निलेश वाघ, विनोद फटींग, लक्ष्मण बदरिया, अशोक रोडे, रमेश बदरिया, बाबाराव वांदीले, कुणाल देशमुख, दत्ता राऊत आदी उपस्थित होते.यावेळी निवेदन देताना अभिजित फाळके म्हणाले की, वर्धा जिल्ह्यातील राजकीय व्यवस्थेच्या नाकाखाली नॅशनल हायवे जमीन अधिग्रहण प्रकरणात शेतकºयांचे शोषण झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सर्र्व चौरस गुणकानुसार अधिग्रहणाचे काम झाले असताना येथे हेक्टरी मापाने अधिग्रहण का ? असा सवाल आहे.