शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

शेतकरी त्रस्त, वन्यप्राणी मस्त आणि वनविभाग सुस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

यावर्षी या भागात सोयाबीन व कपाशीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. शेतकऱ्यांनी तुरीसह इतर पिकांची पेरणी केली असून, ...

यावर्षी या भागात सोयाबीन व कपाशीचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केला आहे. शेतकऱ्यांनी तुरीसह इतर पिकांची पेरणी केली असून, काही शेतकऱ्यांकडे संत्रा व मोसंबीच्या बागा ही आहे. या परिसरातील शेतशिवारात दरवर्षी रोही व रानडुकरांचा वावर असतो. त्यांना जंगलात पुरेसे खाद्य मिळत नसल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा जंगलालगतच्या शेतातील कपाशी व सोयाबीन सोबतच संत्रा व मोसंबीच्या झाडांचे नुकसान करायला सुरुवात केली आहे. रब्बी हंगामात हेच वन्यप्राणी खाद्य व पाण्याच्या शोधात गावालगतच्या शेतात येतात व संत्रा मोसंबीच्या बागांसोबत रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.

वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात शेतात जावे लागते. काही शेतकरी शेतातील मचाणावरून पिकाची पाहणी करीत वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवतात. तर काही शेतकरी रात्रभर पिकांच्या संरक्षण करण्याकरिता जागल करतात. अंधारात त्यांना विषारी सापांचा व अन्य घातक कीटकांचा दंश होण्याची व जीव गमावण्याची भीतीदेखील असते. वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली तर तुटपुंजी मदत मिळते. यामुळे नुकसान भरपाई मागण्यासाठी शेतकरी धजावत नाही.

060921\img-20210813-wa0035.jpg~060921\img-20210813-wa0036.jpg

शेतकरी हिरामण कडू यांच्या शेतात रानडुकरांनी उद्ध्वस्त केले कपाशीचे पीक~शेतकरी हिरामण कडू यांच्या शेतातील उध्वस्त केले कपाशीचे पीक