शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना पायी चालणे कठीण : जीव धोक्यात टाकून जावे लागते शेतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:10 IST

चंदेवाणी ते सेलगाव पांदण रस्त्यावर अवकळा आली आहे. शिवाय नदीवर पूल नसल्याने शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात.

ठळक मुद्दे चंदेवाणी-सेलगाव पांदणीची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : चंदेवाणी ते सेलगाव पांदण रस्त्यावर अवकळा आली आहे. शिवाय नदीवर पूल नसल्याने शेतकरी पाण्यातून वाट काढून शेतात जातात. परिणामी, त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वेळा पांदण रस्ता व पुलासाठी पाहणी झाली; पण अद्याप मुहूर्त गवसला नाही. यामुळे आजही चंदेवाणी येथील शेतकºयांना यातना सहन कराव्या लागत आहेत.चंदेवाणी हे मुख्य व्यवसाय शेती असलेले गाव आहे. येथील ६० ते ७० शेतकºयांची शेती सेलगाव शिवारात आहे. शेतात जायचे असल्यास एका अरूंद पांदण रस्त्याने जावे लागते. या चंदेवाणी-सेलगाव पांदण रस्त्यावर मोठे दगड आहेत. पावसाळ्यात चिखल व पाणी साचते. बैलबंडी तर सोडा पायी चालणेही कठीण आहे. या पांदण रस्त्याने एक किमी अंतर पूढे जाताच लहान नदी आहे. या नदीवर रपटाही बांधण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वर्षांपासून शेतकºयांना शेतात जाताना कंबरभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन जावे लागते. ही नदी पार करताना महिलांना तर तारेवरची कसरत करावी लागते. यात अनेक अपघातही झाले आहेत.याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा ग्रा.पं.मध्ये ठराव घेऊन लेखी प्रस्ताव शासनाकडे पाठविला; पण या समस्येला शासनाने केराची टोपली दाखविली. दोन वेळा पांदण रस्ता व पुलाच्या बांधकामासाठी मोजमाप झाले; पण पांदण रस्ता व पूल बांधण्याचा मुहूर्त निघाला नाही. हा पांदण रस्ता अत्यंत खराब असल्याने शेतकºयांना शेतमाल सुरक्षित घरी आणता येत नाही. हा दोन किमी पांदण रस्ता झाला तर चंदेवाणी येथील नागरिकांना सेलगाव मार्गे काटोल मार्केटला आपला शेतमाल विक्रीस नेता येईल. गावातील विद्यार्थ्यांना काटोल येथे उच्च शिक्षणासाठी जाता येईल. या पांदण रस्त्याने काटोल शहराचे अंतर कमी आहे. यामुळे काटोलला जाण्याचा वेळ व त्रास वाचणार असून गावाचा विकास साधला जाणार आहे.ग्रा.पं. भवन लोकार्पण सोहळ्यात चंदेवाणी येथील ग्रामस्थांनी पांदण रस्त्याची स्थिती व नदीवरील पुलाची गरज विद्यमान आमदारांच्या लक्षात आणून दिली. त्यांना पांदण रस्त्याने चालणेही कठीण झाले होते. मग, वर्षभर या रस्त्याने शेतकरी कसे जात असतील, याची कल्पना न केलेली बरी. आमदारांनी या रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून रस्ता व पूल बांधून देण्याची ग्वाही दिली. यामुळे ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.स्मशानभूमी नसल्याने अंतिम संस्कारातही येतात अडचणीचंदेवाणी या गावात स्मशानभूमीदेखील नाही. यामुळे नागरिकांना मृतदेहावर अंतिम संस्कार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर प्रेतांना अग्नि देताना कसरतच करावी लागते. आकाशाच्या छताखाली भर पावसात मृतदेहांना अग्नि द्यावा लागतो. या प्रकारामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी तथा प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. स्मशान भूमी व शेड नसणे ही लाजीरवाणीच बाब आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.