शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या लाभापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: July 18, 2016 00:39 IST

आर्वी कृषी विभागांतर्गत गावोगावी असलेले कृषी सहायक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांची मुख्यालयी दांडी विरूळ (आकाजी) : आर्वी कृषी विभागांतर्गत गावोगावी असलेले कृषी सहायक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. परिणामी, तालुक्यातील अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. अनेक कृषी सहायक आर्वी, वर्धा येथून मुख्यालयी ये-जा करतात. यामुळे ते गावात कधी येतात व कधी जातात, हे शेतकऱ्यांना माहितीच होत नाही. त्यांचा नेमका दिवस कोणता, हे माहिती नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. कृषी सहायकांनी ठराविक दोन दिवस प्रत्येक गावी ग्रा.पं. मध्ये बसून शेतकऱ्यांची कामे करून योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. परिसरातील काही कृषी सहायक विरूळच्या विकास फार्ममधून कारभार सांभाळतात. विकास फार्म गावापासून एक-दीड किमी अंतरावर असल्याने योजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. रसुलाबादच्या कृषी सहायकाने १६० शेतकऱ्यांना सोयाबीन थैल्यांचे वाटप केले. यात शेतकऱ्यांकडून प्रती बॅग ९८० रुपये घेण्यात आले; पण काही दिवसांनी शेतकऱ्यांचे पैसे परत करून मोफत वाटप केले. याबाबत कृषी सहायक केंद्रे यांना विचारले असता शेतकऱ्यांकडून सोयाबीन थैल्यांचे पैसे घेण्यात आले; पण नंतर शासन परिपत्रक आल्याने मोफत वाटप करून पैसे परत केले. यातील नेमका गोंधळ काय, हे शेतकऱ्यांना कळले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)