शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शेतकऱ्यांचे खाते कर्जातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:46 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या.

ठळक मुद्देतीन याद्या जाहीर : ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम झाली वळती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. या याद्यात नाव असलेल्या एकूण ३४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे बँक खात्यात रक्क्म आली तर २४ हजार ३४९ शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे खाते कर्जातच असल्याचे दिसते.कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार काम सुरू करण्यात आले असून याद्या जाहीर करण्याचे काम सुरू आहे. वर्धेत आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५७ शेतकऱ्यांना ४५३.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे बाकी आहे.कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोजा; व्याजाचा बडगा कायमशेतकºयांकरिता कर्जमाफीची योजना जाहीर होणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे यात मोठा कालावधी गेला. या काळात बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जावर व्याजाची आकारणी केली. शासनाने पाठविलेल्या याद्यात त्या काळातील कर्जाचा उल्लेख होता. मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेकडे गेल्यावर आकारलेले व्याज शिल्लक राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त नाही तर कर्जयुक्त राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याचा लाभ झाला नसल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे. या कालावधीत चढलेले व्याज कोण भरणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.कर्जमाफीच्या जाहीर यादीत वर्धा जिल्ह्यातील ५५ हजार २७२ शेतकरी दीड लाख रुपयांच्या आतील आहेत. त्यांची थकबाकी ४३७.२६ कोटी रुपये आहे. या पैकी ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम आली नसून त्यांना कर्जमाफीची अद्याप प्रतीक्षा आहे.नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ९९० शेतकऱ्यांना ४.१७ कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. यातील केवळ १ हजार ७११ शेतकऱ्याच्या खात्यात ३ कोटी ५९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे नियमित कर्जभरणाऱ्या उर्वरीत २०० शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम येण्याकरिता काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.