शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शेतकऱ्यांचे खाते कर्जातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:46 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या.

ठळक मुद्देतीन याद्या जाहीर : ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम झाली वळती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. या याद्यात नाव असलेल्या एकूण ३४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे बँक खात्यात रक्क्म आली तर २४ हजार ३४९ शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे खाते कर्जातच असल्याचे दिसते.कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार काम सुरू करण्यात आले असून याद्या जाहीर करण्याचे काम सुरू आहे. वर्धेत आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५७ शेतकऱ्यांना ४५३.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे बाकी आहे.कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोजा; व्याजाचा बडगा कायमशेतकºयांकरिता कर्जमाफीची योजना जाहीर होणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे यात मोठा कालावधी गेला. या काळात बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जावर व्याजाची आकारणी केली. शासनाने पाठविलेल्या याद्यात त्या काळातील कर्जाचा उल्लेख होता. मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेकडे गेल्यावर आकारलेले व्याज शिल्लक राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त नाही तर कर्जयुक्त राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याचा लाभ झाला नसल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे. या कालावधीत चढलेले व्याज कोण भरणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.कर्जमाफीच्या जाहीर यादीत वर्धा जिल्ह्यातील ५५ हजार २७२ शेतकरी दीड लाख रुपयांच्या आतील आहेत. त्यांची थकबाकी ४३७.२६ कोटी रुपये आहे. या पैकी ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम आली नसून त्यांना कर्जमाफीची अद्याप प्रतीक्षा आहे.नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ९९० शेतकऱ्यांना ४.१७ कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. यातील केवळ १ हजार ७११ शेतकऱ्याच्या खात्यात ३ कोटी ५९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे नियमित कर्जभरणाऱ्या उर्वरीत २०० शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम येण्याकरिता काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.