शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे खाते कर्जातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:46 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या.

ठळक मुद्देतीन याद्या जाहीर : ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम झाली वळती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आणली. या कर्जमाफीच्या घोषणेदरम्यान जिल्ह्यात उडालेल्या गोंधळानंतर तीन याद्या जाहीर झाल्या. या याद्यात नाव असलेल्या एकूण ३४ हजार ५०९ शेतकऱ्यांचे बँक खात्यात रक्क्म आली तर २४ हजार ३४९ शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचे खाते कर्जातच असल्याचे दिसते.कर्जमाफीची योजना जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ९८ हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले होते. या अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या ग्रीन, येलो आणि रेड अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. या याद्यानुसार काम सुरू करण्यात आले असून याद्या जाहीर करण्याचे काम सुरू आहे. वर्धेत आतापर्यंत एकूण ५८ हजार ८५७ शेतकऱ्यांना ४५३.७७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. मात्र त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे बाकी आहे.कर्जमाफीनंतरही सातबारावर कर्जाचा बोजा; व्याजाचा बडगा कायमशेतकºयांकरिता कर्जमाफीची योजना जाहीर होणे आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणे यात मोठा कालावधी गेला. या काळात बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्यातील कर्जावर व्याजाची आकारणी केली. शासनाने पाठविलेल्या याद्यात त्या काळातील कर्जाचा उल्लेख होता. मात्र कर्जमाफीची रक्कम बँकेकडे गेल्यावर आकारलेले व्याज शिल्लक राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्त नाही तर कर्जयुक्त राहत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात याचा लाभ झाला नसल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे. या कालावधीत चढलेले व्याज कोण भरणार असा सवाल शेतकऱ्यांकडून होत आहे.कर्जमाफीच्या जाहीर यादीत वर्धा जिल्ह्यातील ५५ हजार २७२ शेतकरी दीड लाख रुपयांच्या आतील आहेत. त्यांची थकबाकी ४३७.२६ कोटी रुपये आहे. या पैकी ३२ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात २०७.५६ कोटी रुपये जमा झाले आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम आली नसून त्यांना कर्जमाफीची अद्याप प्रतीक्षा आहे.नियमित कर्ज भरणाऱ्या १ हजार ९९० शेतकऱ्यांना ४.१७ कोटी रुपयांची माफी मिळाली आहे. यातील केवळ १ हजार ७११ शेतकऱ्याच्या खात्यात ३ कोटी ५९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. यामुळे नियमित कर्जभरणाऱ्या उर्वरीत २०० शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम येण्याकरिता काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.