शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

शेतकरी चिंतेत : शासन आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: July 14, 2014 02:26 IST

नैसर्गिक प्रकोपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या

अलाहाबाद बँकेचे कर्ज पुनर्गठनात हात वरसंजय बिन्नोड विजयगोपालनैसर्गिक प्रकोपात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याच्या मदतीकरिता शासनाने कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश बँकाना दिले. मात्र कर्ज पुनर्गठणात अलाहाबाद बँकेने हात वर केले आहे. या बाबत शेतकऱ्यांनी बँक व्यवस्थापकांना विचारणा केली असता अशी कुठलीही सुचना नसल्याचे सांगण्यात येत आहे. गत वर्षी खरीपात अतीवृष्टी आणि रबीत गारपीट झाले. दोन्ही हंगाम उध्वस्त झाले. निसर्गाच्या या प्रकोपाने बऱ्याच शेतकऱ्याना कर्ज भरणे अशक्य झाले. अशात थकबाकीदार असल्याने शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला. अशा स्थितीत शासनाने ३० जूनपर्यंत कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याचे आदेश दिले. शासनाच्या या निर्णयाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; पण विजयगोपाल येथील शेतकरी सुधाकर झोपाटे यांच्याकडे अलाहाबाद बँकेचे कर्ज असल्याने त्या कर्जाचे पुर्नगठन करण्याकरिता बँकेत गेले. यावेळी बॅक व्यवस्थापकाने असा कुठलाही आदेश बँकेला नाही म्हणून कर्ज पुनर्गठणासाठी हात वर केले आहे. बँक मुख्यमंत्र्यांचा आदेशही पाळायला तयार नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसत आहे. यावर्षीही पाऊस लांबल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुबार पेरणीचे संकट त्याच्यावर आले आहे. पुन्हा कर्ज मिळाल्यास शेतकऱ्याना मोलाची मदत होणार आहे. अलाहाबाद बँकेने हात वर केल्याने शेतकऱ्याना सावकराचे उंबरठे झिजवावे लागत आहे. माहागडे बियाणे नष्ट झाल्यानंतर आता दुबार पेरणीसाठी बियाणे आणावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच शासनाने पुनर्गठणाच्या आदेशाला अलाहाबाद बॅकेच्या येथील शाखेने हात वर केल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.शेतकरी सावकाराच्या दारीपावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशात बँकांनी दिलेले कर्ज पहिल्या पेरणीतच गेले. शिवाय आजा कर्जावे पुनर्गठन करण्यास बँक नकार देत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी आर्थिक अडचण येत आहे. यामुळे शेतकरी सावकाराच्या दारी जात आहे.अजूनपर्यंत कर्ज पुनर्गठनाचा आदेश बँकेला म्हणजे मला मिळाला नाही. असा आदेश आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्रगठन नियमाप्रमाणे करण्यात येईल.- महेश यादव, अलहाबाद बॅक मॅनेजर, विजयगोपाल.