शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

शेतकरी आत्महत्या; सात प्रकरणे मंजूर

By admin | Updated: April 8, 2016 02:03 IST

शेतकरी आत्महत्यासंदर्भातील जिल्ह्यात फेब्रुवारीपासून झालेल्या आठ प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन सात आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या आहेत.

जिल्हास्तरीय समितीची बैठक : विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचनावर्धा : शेतकरी आत्महत्यासंदर्भातील जिल्ह्यात फेब्रुवारीपासून झालेल्या आठ प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन सात आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या आहेत. यामध्ये वर्धा तालुक्यातील करंजी (भोगे) येथील विशाल अंबादास पवार, धानोरा येथील आशिष नरेश चौधरी, वाठोडा(धामणगाव) येथील संदीप वाटकर, हिंगणघाट तालुक्यातील येरला येथील मंजुळा ताजने, देवळी तालुक्यातील इंझाळा येथील भावना शरद डहाके, पळसगाव येथील अरूण विठोबा ढोके, कारंजा तालुक्यातील बोरीच्या सुंदराबाई धनराज बैगने या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, देवळी पं.स. चे भगवान भरणे, आर्वी पं.स. सभापती तारा तुमडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे, डॉ. नितीन निमोदिया, अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा व समितीचे सदस्य उपस्थित होते. नैराश्यातील शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागप्रमुखांनी पुढाकार घेण्याच्या सूचना दीपक नलवडे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.(स्थानिक प्रतिनिधी)