शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विरोधी सरकारी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2016 02:04 IST

शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही,

जानराव नागमोते : किसान सभेचा कारंजा (घा.) तालुका शेतकरी मेळावाकारंजा (घा.) : शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही, शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते, किटनाशके, शेतमजुराची मजुरी, जीवन जगण्याचा खर्च वाढला. यामुळे शेतीचा लागत खर्च वाढला. निघालेला शेतमाल विकून गुंतविलेली रक्कम वसूल होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून आत्महत्येकडे वळला. शेतकरी आत्महत्यांना केंद्र-राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच कारणीभूत आहे, असे मत किसान सभेचे जिल्हा सचिव जाणराव नागमोते यांनी व्यक्त केले. किसान सभेद्वारे तालुका शेतकरी मेळावा गुरूदेव मठ सभागृहात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे परसराम जसुतकर, प्रतिष्ठित नागरीक नाना जाधव उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, माकपाचे महेश दुबे, बांधकाम कामगार संघटनेचे गजू ढोरे, जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दरवर्षी हमीभाव आणि त्यात हमीभावाच्या ५० टक्के नफा जोडून सर्व प्रकारचे शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर करावे. त्यात दरवर्षी वाढत्या महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी. जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था शासनाने करावी. त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असे मत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, महेश दुबे, अनिल चव्हाण आदींनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संजय देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता दामोधर कौरती, महादेव देशमुख, माधवराव मडावी, अशोक पुरी, धर्माजी अंबुडारे, गुरूदत्त बारंगे, सुभाष बागडे, छत्रपाल चोपडे, रमेश उईके, जगदीश बैस, मालती चाफले, सुनीता नायर, शेख मोईउद्दीन, दिलीप शेंडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)