शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

कृषी विरोधी सरकारी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या

By admin | Updated: October 21, 2016 02:04 IST

शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही,

जानराव नागमोते : किसान सभेचा कारंजा (घा.) तालुका शेतकरी मेळावाकारंजा (घा.) : शासकीय आकडेवारीप्रमाणे गत १५ वर्षांत देशभरात शेती परवडत नाही, शेतीत नफा मिळत नाही, शेतीला लागणारे बियाणे, रासायनिक खते, किटनाशके, शेतमजुराची मजुरी, जीवन जगण्याचा खर्च वाढला. यामुळे शेतीचा लागत खर्च वाढला. निघालेला शेतमाल विकून गुंतविलेली रक्कम वसूल होत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडून आत्महत्येकडे वळला. शेतकरी आत्महत्यांना केंद्र-राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरणच कारणीभूत आहे, असे मत किसान सभेचे जिल्हा सचिव जाणराव नागमोते यांनी व्यक्त केले. किसान सभेद्वारे तालुका शेतकरी मेळावा गुरूदेव मठ सभागृहात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे परसराम जसुतकर, प्रतिष्ठित नागरीक नाना जाधव उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे यशवंत झाडे, चंद्रभान नाखले, माकपाचे महेश दुबे, बांधकाम कामगार संघटनेचे गजू ढोरे, जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना स्वामीनाथन शेतकरी आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दरवर्षी हमीभाव आणि त्यात हमीभावाच्या ५० टक्के नफा जोडून सर्व प्रकारचे शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर करावे. त्यात दरवर्षी वाढत्या महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी. जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना बाजारपेठेत मिळतील, अशी व्यवस्था शासनाने करावी. त्याशिवाय शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असे मत किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी चंद्रभान नाखले, महेश दुबे, अनिल चव्हाण आदींनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संजय देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री बागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता दामोधर कौरती, महादेव देशमुख, माधवराव मडावी, अशोक पुरी, धर्माजी अंबुडारे, गुरूदत्त बारंगे, सुभाष बागडे, छत्रपाल चोपडे, रमेश उईके, जगदीश बैस, मालती चाफले, सुनीता नायर, शेख मोईउद्दीन, दिलीप शेंडे आदींनी सहकार्य केले. मेळाव्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)