शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शेतकरी लागला खरिपाच्या तयारीला

By admin | Updated: May 10, 2014 00:25 IST

‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे-पुढे चालावे’, या उक्तीनुसार शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामाकरिता शेतकरी सज्ज झाला

 घोराड : ‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे-पुढे चालावे’, या उक्तीनुसार शेतकरी आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामाकरिता शेतकरी सज्ज झाला असून शेतातील उलंगवाडीच्या कामाला वेग आला आहे. गतवर्षी खरीप व रबी हंगामात एन पीक काढणीच्यावेळी पावसाने कहर बरसल्याने शेतकर्‍यांना हाती आलेले पीक गमवावे लागले. यामुळे आर्थिक तोटा सहन करावा लागला. मृग नक्षत्रापासूनच पावसाने लावलेली दमदार हजेरी अखेर शेतातील पिकाला खरडून नेण्यापर्यंत झाली. गाव-शेतात पाणी घुसल्याने शेतकर्‍याचे सुरूवातीलाच नुकसानीला सामोरे जावे लागले. यातून शेतात उर्वरीत पिकांच्या मळणीवेळी पुन्हा पाऊस आल्याने नुकसान सहन करावे लागले. यामुुळे शेतकरी आर्थिक हतबल झाले. यानंरच्या रबी हंगामाकडून शेतकर्‍याना अपेक्षा होती. मात्र गारपिटीने होत्याचे नव्हते केले. सततच्या नापिकीमुळे हतबल झालेल्या बळीराजाला जुने विसरुन येत्या खरीप हंगामासाठी सज्ज व्हावे लागले आहे. काही शेतकर्‍यांनी उन्हाळवाही केली असून पीक नियोजनात लागले आहे. तर काही शेतात कापूस वेचणी अजूनही सुरू आहे. मजूरांची कमतरता भासत असल्याने शेतातील अनेक कामे मात्र खोळंबली आहे.(वार्ताहर)