शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या पैशाकरिता किसान अधिकारचे आंदोलन

By admin | Updated: June 13, 2014 00:24 IST

जिल्हा सहकारी बँकेला शासनाकडून पॅकेज देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या, यामुळे बँकेत अडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेने परत कराव्यात, या मागणीकरिता गुरुवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने

वर्धा : जिल्हा सहकारी बँकेला शासनाकडून पॅकेज देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या, यामुळे बँकेत अडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेने परत कराव्यात, या मागणीकरिता गुरुवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हा बँकेत आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवदेन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिझर्व बँकेच्या आदेशावर जिल्हा बँक अवसायानात निघण्याच्या प्रक्रियेला स्थगनादेश देण्यासाठी विनंती केली होती. त्याच्या विनंतीवर राज्य शासनाने डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकांना आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले. न्यायालयाने रिझर्व बँकेच्या आदेशाला ठेविदारांचे हित व इतर सर्व समावेशक घटकांचा विचार करून राज्य शासनाला आर्थिक मदत देण्याची सूचना करून तात्पूरता स्थगनादेश दिला.

राज्य शासनाने यावर सामंजस्यासने विचार करून विदर्भातील वर्धा, बुलढाणा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकांची तरलता (सीआरएआर) व्यवस्थीत करण्यासाठी या तीन बँकांना ३१९ कोटी रुपयांची मदत (वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १०२ कोटी रुपये) देण्याचा प्रस्ताव ४ जून २०१४ ला रात्री मंत्रिमंडळात सादर केला. यासंबंधातील घोषणा राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार ११ जून २०१४ रोजी केली.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेविदारांच्या रकमा सुरक्षीत करण्यासाठी, गरजू ठेविदारांना आवश्यकतेप्रमाणे जमा रकमा काढता याव्या यासाठी व जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी किसान अधिकार अभियानच्या वतीने राज्यशासनाला मागील वर्षभरात वेळोवेळी निवेदन दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवहार व्यवस्थीत करून ठेविदारांचा पुन:विश्वास संपादन करण्यासाठी जिल्ह्यातील सुज्ञ ठेविदारांच्या रकमा परत करण्याकरिता कारवाई करण्याची मागणी किसान अधिकार अभियानद्वारे करण्यात आली. या मागणीकरिता किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या मार्गदर्शनात बँकेच्या सभागृहात ठेविदाराच्या उपस्थितीत आंदोलन केले. यावेळी ठेवीदार उपस्थित होते़(प्रतिनिधी)