शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ठेवीदारांच्या पैशाकरिता किसान अधिकारचे आंदोलन

By admin | Updated: June 13, 2014 00:24 IST

जिल्हा सहकारी बँकेला शासनाकडून पॅकेज देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या, यामुळे बँकेत अडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेने परत कराव्यात, या मागणीकरिता गुरुवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने

वर्धा : जिल्हा सहकारी बँकेला शासनाकडून पॅकेज देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या, यामुळे बँकेत अडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेने परत कराव्यात, या मागणीकरिता गुरुवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने जिल्हा बँकेत आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवदेन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिझर्व बँकेच्या आदेशावर जिल्हा बँक अवसायानात निघण्याच्या प्रक्रियेला स्थगनादेश देण्यासाठी विनंती केली होती. त्याच्या विनंतीवर राज्य शासनाने डबघाईस आलेल्या जिल्हा सहकारी बँकांना आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन न्यायालयात दिले. न्यायालयाने रिझर्व बँकेच्या आदेशाला ठेविदारांचे हित व इतर सर्व समावेशक घटकांचा विचार करून राज्य शासनाला आर्थिक मदत देण्याची सूचना करून तात्पूरता स्थगनादेश दिला.

राज्य शासनाने यावर सामंजस्यासने विचार करून विदर्भातील वर्धा, बुलढाणा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकांची तरलता (सीआरएआर) व्यवस्थीत करण्यासाठी या तीन बँकांना ३१९ कोटी रुपयांची मदत (वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १०२ कोटी रुपये) देण्याचा प्रस्ताव ४ जून २०१४ ला रात्री मंत्रिमंडळात सादर केला. यासंबंधातील घोषणा राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार ११ जून २०१४ रोजी केली.

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेविदारांच्या रकमा सुरक्षीत करण्यासाठी, गरजू ठेविदारांना आवश्यकतेप्रमाणे जमा रकमा काढता याव्या यासाठी व जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी किसान अधिकार अभियानच्या वतीने राज्यशासनाला मागील वर्षभरात वेळोवेळी निवेदन दिले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा व्यवहार व्यवस्थीत करून ठेविदारांचा पुन:विश्वास संपादन करण्यासाठी जिल्ह्यातील सुज्ञ ठेविदारांच्या रकमा परत करण्याकरिता कारवाई करण्याची मागणी किसान अधिकार अभियानद्वारे करण्यात आली. या मागणीकरिता किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्या मार्गदर्शनात बँकेच्या सभागृहात ठेविदाराच्या उपस्थितीत आंदोलन केले. यावेळी ठेवीदार उपस्थित होते़(प्रतिनिधी)