शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकरी धडकले तहसीलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:08 IST

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.

ठळक मुद्देराकाँचे आंदोलन : जाहीर सभेतून सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी एकत्र येत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. त्यानंतर मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले. जाहीर सभेदरम्यान मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सरकारवर कडाडून टिका केली.शेतातील उभ्या पिकांना ओलीत करण्यासाठी कृषीपंपांना दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्युत पुरवठा देण्यात यावा. संपूर्ण वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, मागील हंगामात जाहीर केलेल्या गुलाबी बोंडअळीचे अनुदान उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्या तात्काळ जमा करण्यात यावे. यंदाच्या हंगामातही गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वेक्षण करून कपाशी उत्पादकांना शासकीय मदत देण्यात यावी. आधारभूत हमी भाव दराने शासकीय खरेदी केंद्र वर्षभर सुरू ठेवण्यात यावेत, शेतमाल तारण योजनेत सहभागी शेतकऱ्यांना आधारभूत दराचे संरक्षण देण्यात यावे, धाम प्रकल्पाचे पाणी सिचनासाठी सोडण्यात यावे. गामीण भागातील रस्त्यांची दुरूस्ती करून नवीन सिमेंट रस्ते तयार करण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी मागण्या मोर्चाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या. मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून तहसील कार्यालय गाठले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक करंडे यांनी स्विकारले. जाहीर सभेदरम्यान शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव किशोर माथनकर, जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, वर्षा निकम, हिम्मत चतुर, अशोक वादिले, आफताब खान, रमेश भोयर, सुरेंद्र कुकेकार, हरीश वडतकर,पांडुरंग निबालकर, राजु चंदनखेडे, किशोर गाठे, राजू चाफले, डॉ. निर्मेश कोठारी, नरेंद्र थोरात, गंगाधर हिवांज, अरुण बकाल, हेमंत पाहुणे, बबलू सांगळे, गणेश वैरागडे, वामन डभारे, पिंटू सोनवणे, प्रशांत बोरकुटे, दीपक पंधरे, पांडुरंग बादले, जनार्धन हुलके, शालीक वैद्य, रामभाऊ चौधरी, आशीष अंड्रस्कर, शांतीलाल गांधी, चंदू बादले, मधुकर कामडी, मधुकर डंभारे, उत्तम भोयर, हरिष काळे, भूषण पिसे, नगरसेवक धनंजय बकाने, प्रकाश राऊत, विनोद झाडे आदी सहभागी झाले होते.हे सरकार उद्योगपतींचेच -कोठारीया सरकारला शेतकऱ्यांची गरज नाही. तो मेला तरी चालेल असेच सद्याच्या केंद्र व राज्य सरकारचे धोरण असल्याचे दिसून येते. केवळ सिमेंट रस्त्याचे भूमिपुजन करून काम सुरू अन् रस्ता बंद अशी या सरकारची अवस्था झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हद्दपार केल्याशिवाय शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार नाही. या देशात शरद पवार यांच्या रुपाने एकमेव जाणता राजा आहे. त्यांनी ५६ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला होता. याउलट हे सरकार आहे. सध्याच्या सरकारकडून कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांनाच वेठीस धरले जात आहे. विद्यमान सरकारने निवडणुकीच्यावेळी शेतकºयांसह जनतेला विविध आश्वासने दिली होती. याच आश्वासनांच्या जोरावर भाजपा सत्तारुढ झाली. मात्र, सत्ता मिळताच या गोरगरीब व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर उद्योगपदींचे हित जोपासले जात आहे. येत्या निवडणुकीत या सरकारला हद्दपार करण्याचे आवाहन यावेळी शेतकरी नेता अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी सांगितले.भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवा -निकमच्या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. शेतकºयांना वेठीस धरणाऱ्या सरकारला घरी पाठविणे गरजेचे असून सत्ताधाऱ्यांना निवडणुकीत घरचा रस्ता शेतकºयांनीच दाखवावा, असे आवाहन राकाँच्या निरीक्षका वर्षा निकम यांनी केले.