शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

बाजारात दहाच्या ‘नकली’ नाण्यांचा गोंधळ

By admin | Updated: January 14, 2017 01:31 IST

केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या मोबदल्यात नवीन

बँकांत माहितीचा अभाव : खरी-खोटी नाणी ओळखणे कठीण वर्धा : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. या मोबदल्यात नवीन दोन हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा बाजारात आल्या. या नोटबंदीच्या निर्णयामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली. या पाठोपाठ दहा रुपयांची नाणी खरी-खोटी असल्याची अफवा बाजारात पसरली. परिणामी, प्रत्येकाने दडवून ठेवलेली नाणी बाजारात काढली. यातच एका बँकेने नाणी नकली असल्याचे सांगितल्याने मार्केटमधील ‘नकली’ नाण्यांचा गोंधळ सुरू झाल्याचे चित्र आहे. देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेकांकडे काळा पैसा साठविलेला आहे. भ्रष्टाचार कमी करीत काळा पैसा बाहेर काढण्याचा उपाय म्हणून नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला. या माध्यमातून ५००, १००० रुपयांच्या नकली नोटाही आपोआप चलनातून बाद होतील, असे ठाम मत मांडण्यात आले होते. तसे झालेही; पण नवीन नोटाही नकली आढळून आल्याने खळबळ माजली. नोटबंदीच्या निर्णयामुळे बाजारात अस्थिरता असताना, गोरगरीब, सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांचे व्यवहार ठप्प झालेले असतानाच नकली नाण्यांच्या अफवांनाही पेव फुटले. नागपूरसारख्या ‘मेट्रोसिटी’मध्येही दहा रुपयांची नाणी नकली असल्याचा कांगावा करीत ती बाजारात काढली गेली. या पाठोपाठ अन्य लहान-मोठ्या शहरांतही दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास सामान्य, लहान व्यावसायिक यांच्याकडून नकार मिळू लागला. परिणामी, नोटबंदीच्या निर्णयामुळे आलेली अस्थिरता आणखीच भयावह झाली. खरोखरच दहा रुपयांची नाणी नकली असतील काय, असा प्रश्न सामान्य एकमेकांना विचारताना दिसून येत आहे. सध्या दहा रुपयांची ही नाणी काही नागरिक स्वीकारत असले तरी त्यातील खरे-खोटेपणा कसा ओळखायचा, या बाबी अद्याप कुणाच्या गावातही नाहीत. यातच देवळी शहरामध्ये एका व्यक्तीला त्यांच्याकडील दहा रुपयांची दहा नाणी नकली असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत संबंधित इसमाचे १०० रुपयांचे नुकसान झाले; पण ती नाणी खोटी असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. देवळी शहरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत खऱ्या-खोट्या नाण्यांबाबतची स्थिती आणखीच गोंधळाची झाल्याचे चित्र आहे. बँकांमध्येही दहा रुपयांच्या खऱ्या आणि खोट्या नाण्यांबाबत माहिती वा नोटिफिकेशन उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेने कुठलीही नाणी खोटी नाहीत, असे नोटिफिकेशन काढले होते; पण देवळीमध्ये झालेल्या कारवाईमुळे ऐकावे कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रिझर्व्ह बँकेसह राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी बाजारातील गोंधळ आणि नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी जागृती करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) ४चलनामध्ये असलेली सर्वच नाणी खरी असल्याचे नोटिफिकेशन यापूर्वी रिझर्व्ह बँकेने काढले आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारीही यावरच ठाम आहेत. दहा रुपयांच्या खऱ्या-खोट्या नाण्यांबाबत त्यानंतर कुठल्याही सूचना नाहीत, दहा रुपयांची नाणी सर्व खरीच आहेत, नकली नाहीत, असे बँकांच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असेल तर मग, देवळीतील बडोदा बँकेने परत केलेली दहा रुपयांची दहा नाणी खोटी होती काय, हा प्रश्नच आहे. यात संबंधित ग्राहकाला १०० रुपयांचा फटका तर बसला; पण नाणी खरी की खोटी, हा संभ्रम दूर झाला नाही. परिणामी, बँकेतील अधिकाऱ्यांच्या त्या वक्तव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. काही समज, गैरसमज ४दहा रुपयांची सर्वच नाणी खरी असल्याचे आरबीआय ठासून सांगत असताना बडोदा बँकेने दहा नाणी खोटी ठरविली. नाण्यांवर दहा हा आकडा मध्यभागी मोठ्या अंकात लिहून असलेली नाणी खोटी असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय दहापेक्षा अधिक रेषा असलेली नाणीही खोटी असल्याचे सांगितली जात आहे. असे असले तरी बाजारामध्ये बहुतांश नाणी अशाच प्रकारची नाणी आढळून येतात. मग, यातील खरी आणि खोटी नाणी कोणती, हे कोण सांगणार, हा प्रश्नच आहे. यावर बँकांनीच उत्तर शोधणे गरजेचे झाले आहे. बँकेचे अधिकारी ठामच ४दहा रुपयांची कोणती नाणी खरी आणि कोणती खोटी हे कसे ओळखावे, याबाबत काही बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली; पण खोटी नाणी नाहीत. बाजारात असलेली दहा रुपयांची सर्व नाणी आरबीआयच्या मते खरीच आहे. प्रत्येक वर्षी या नाण्यांची निर्मिती करण्यात आली, अशी माहितीही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली.