शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

पावसाअभावी विमा योजनेचा फज्जा

By admin | Updated: July 1, 2014 01:39 IST

शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपूरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर

अमोल सोटे - आष्टी (श़)शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपूरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली; पण वर्धा जिल्ह्यात कृषी विभाग व बँकांतील अंतर्गत मतभेदामुळे योजनेचा पूरता बट्ट्याबोळ झाला आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.राष्ट्रीय पीक विमा योजनेचा खरिपाच्या सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद पिकासाठी लाभ दिला जातो. दरवर्षी पेरणी झाल्याबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज घेऊन भरावा लागतो. भरलेला अर्ज संबंधित मौजांतर्गत येणाऱ्या बँकेत जमा करावा लागतो. यासाठी कृषी अधीक्षक वर्धा यांना शासनाकडून शेतीशाळा घेण्याचे आदेश आले होते; पण जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकही शेतीशाळा अद्याप घेण्यात आली नाही. यामुळे शेतकरी अर्जांपासून अनभिज्ञच राहिले़ सदर योजनेचा अंतिम कालावधी ३० जून आहे; पण अद्याप पावसाअभावी पेरणीच व्हायची आहे. यामुळे अर्ज भरून देण्यास अडचण जात आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कुठलीच मदत करीत नाही. पेरणीअभावी शासन पेरणीपूर्व पीक विमा योजनेचे अर्ज घेणार काय, त्यानंतर पिकात बदल झाल्यास काय करावे आदी माहिती शेतकऱ्यांकडे नाही. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडल्याने खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, मुग व उडीद पिकाची लागवड झाली नाही. यासाठी कृषी विभागाने २० जुलैपर्यंत योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. तुर्तास शासन व बँका यांनी काय धोरण ठरविले, याची माहिती मिळू शकली नाही.