शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी विमा योजनेचा फज्जा

By admin | Updated: July 1, 2014 01:39 IST

शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपूरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर

अमोल सोटे - आष्टी (श़)शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करता यावा आणि अपूरा पाऊस, पावसातील खंड, अति पाऊस या तीन हवामान घटकाच्या धोक्यापासून शेती पिकांना संरक्षण मिळावे म्हणून राज्य शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली; पण वर्धा जिल्ह्यात कृषी विभाग व बँकांतील अंतर्गत मतभेदामुळे योजनेचा पूरता बट्ट्याबोळ झाला आहे. या योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.राष्ट्रीय पीक विमा योजनेचा खरिपाच्या सोयाबीन, कपाशी, मुग, उडीद पिकासाठी लाभ दिला जातो. दरवर्षी पेरणी झाल्याबरोबर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज घेऊन भरावा लागतो. भरलेला अर्ज संबंधित मौजांतर्गत येणाऱ्या बँकेत जमा करावा लागतो. यासाठी कृषी अधीक्षक वर्धा यांना शासनाकडून शेतीशाळा घेण्याचे आदेश आले होते; पण जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकही शेतीशाळा अद्याप घेण्यात आली नाही. यामुळे शेतकरी अर्जांपासून अनभिज्ञच राहिले़ सदर योजनेचा अंतिम कालावधी ३० जून आहे; पण अद्याप पावसाअभावी पेरणीच व्हायची आहे. यामुळे अर्ज भरून देण्यास अडचण जात आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरणीपूर्व कुठलीच मदत करीत नाही. पेरणीअभावी शासन पेरणीपूर्व पीक विमा योजनेचे अर्ज घेणार काय, त्यानंतर पिकात बदल झाल्यास काय करावे आदी माहिती शेतकऱ्यांकडे नाही. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा खंड पडल्याने खरिपाच्या कपाशी, सोयाबीन, मुग व उडीद पिकाची लागवड झाली नाही. यासाठी कृषी विभागाने २० जुलैपर्यंत योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. तुर्तास शासन व बँका यांनी काय धोरण ठरविले, याची माहिती मिळू शकली नाही.