लिलाव न झालेल्या घाटांवर वक्रदृष्टी : वडगाव, खंबीतसह सर्वत्र रेतीची लूटवर्धा : महसूल विभागाने जिल्ह्यातील निवडक रेती घाटांचे लिलाव करून वाळू उपस्याची परवानगी दिली; पण घाटधारक व संबंधित व्यावसायिक लिलाव न झालेल्या घाटांवरच वक्रदृष्टी ठेवत रेतीची लयलूट करीत असल्याचे दिसते. याबाबत खंबीत, वडगाव येथील नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संबधित विभागाने याकडे लक्ष देत ही लूट थांबविणे गरजेचे झाले आहे. वर्धा नदीतील दिघी (महल्ले) येथील रेतीघाटाचा लिलाव प्रशासनाने केला; पण वडगाव घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. असे असताना कंत्राटदार वडगाव घाटातून रेतीचा अवैध उपसा करीत असल्याचे दिसते. याबाबत वडगाव ग्रा.पं. चे उपसरपंच उमाकांत पांडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली; पण अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने रेती उपस्याला उधाण आले आहे. वर्धा नदीतील काही रेतीघाटांचे लिलाव झाले तर काहींचे पर्यावरण संवर्धनाच्या कारणावरून लिलाव झाले नाहीत. दिघी (महल्ले) येथील घाटाचा लिलाव करण्यात आला; पण त्याला लागून असलेल्या वडगाव (पांडे) या घाटाचा लिलाव झाला नाही. असे असले तरी घाटधारक घेतलेल्या घाटातील रेतीसह लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा करीत असल्याचे दिसून येते. वडगाव ग्रा.पं. चे उपसरपंच उमाकांत पांडे यांनी तक्रारही केली; पण महसूल विभागातील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनासाठी रेतीघाटाचा लिलाव न करण्याच्या शासनाच्या धोरणालाही हरताळ फासला जात आहे. हा प्रकार अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारातून होत असल्याची शंकाही तक्रारीतून व्यक्त करण्यात आली. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सावंगी (येंडे) घाटातील अवैध रेती वाहतूक सुरूदेवळी तालुक्यातील सावंगी (येंडे) रेती घाटाचा लिलाव झाला; पण या घाटातून परवानगीपेक्षा अधिक रेतीचा उपसा करण्यात आला. काही दिवस रेतीची लयलूट केल्यानंतर सध्या उपसा बंद असल्याचे सांगण्यात येते. रेतीची वाहतूक करणारे चालक, मालक वेळ, तारीख नसलेल्या रॉयल्टी स्लिप एकदाच घेतात. लिलाव झालेल्या घाटाच्या मालकांकडून व त्यानंतर वाहन चालक, मालक एकाच रॉयल्टी स्लिपवर १० ते १५ वेळा रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार सावंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यात एखादा अधिकारी रेतीचे ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर पकडताना दिसले की, लगेच चालक, मालक वेळ व दिनांक आपल्या हाताने लिहितात. रॉयल्टीची रेती वाहतूक करीत असल्याचे दाखविले जाते. महसूल अधिकारी रेती घाटावर छापा मारतात; पण घाटधारक व वाहतूकदारांना याची पूर्वकल्पना मिळते. मग, ते आपली वाहने लिलाव झालेल्या घाटामध्ये उभी करतात.आष्टी तालुक्यातही लूटवर्धा नदीवरील बहुतांश रेती घाटांतून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. यात लिलाव झालेल्या घाटातून परवानगीपेक्षा अधिक तर लिलाव न झालेल्या घाटांतून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यातील घाटांतूनही जेसीबी, पोकलॅण्ड व बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. गतवर्षी सावंगी येंडे घाटात बोटीही जाळण्यात आल्या होत्या. हा प्रकार रोखणे गरजेचे आहे.परिणामी, अधिकाऱ्यांना रित्या हातानेच परतावे लागते. हा प्रकार देवळी तालुक्यात अधिक होत असल्याचेही दिसून येते. अधिकाऱ्यांच्या पाळतीवरच घाटधारक काही व्यक्ती नेमत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
रेतीच्या अवैध उपस्याला उधाण
By admin | Updated: February 14, 2016 01:59 IST