शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या अवैध उपस्याला उधाण

By admin | Updated: February 14, 2016 01:59 IST

महसूल विभागाने जिल्ह्यातील निवडक रेती घाटांचे लिलाव करून वाळू उपस्याची परवानगी दिली; पण घाटधारक व संबंधित व्यावसायिक लिलाव न झालेल्या

लिलाव न झालेल्या घाटांवर वक्रदृष्टी : वडगाव, खंबीतसह सर्वत्र रेतीची लूटवर्धा : महसूल विभागाने जिल्ह्यातील निवडक रेती घाटांचे लिलाव करून वाळू उपस्याची परवानगी दिली; पण घाटधारक व संबंधित व्यावसायिक लिलाव न झालेल्या घाटांवरच वक्रदृष्टी ठेवत रेतीची लयलूट करीत असल्याचे दिसते. याबाबत खंबीत, वडगाव येथील नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. संबधित विभागाने याकडे लक्ष देत ही लूट थांबविणे गरजेचे झाले आहे. वर्धा नदीतील दिघी (महल्ले) येथील रेतीघाटाचा लिलाव प्रशासनाने केला; पण वडगाव घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. असे असताना कंत्राटदार वडगाव घाटातून रेतीचा अवैध उपसा करीत असल्याचे दिसते. याबाबत वडगाव ग्रा.पं. चे उपसरपंच उमाकांत पांडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली; पण अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने रेती उपस्याला उधाण आले आहे. वर्धा नदीतील काही रेतीघाटांचे लिलाव झाले तर काहींचे पर्यावरण संवर्धनाच्या कारणावरून लिलाव झाले नाहीत. दिघी (महल्ले) येथील घाटाचा लिलाव करण्यात आला; पण त्याला लागून असलेल्या वडगाव (पांडे) या घाटाचा लिलाव झाला नाही. असे असले तरी घाटधारक घेतलेल्या घाटातील रेतीसह लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा करीत असल्याचे दिसून येते. वडगाव ग्रा.पं. चे उपसरपंच उमाकांत पांडे यांनी तक्रारही केली; पण महसूल विभागातील अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी, लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनासाठी रेतीघाटाचा लिलाव न करण्याच्या शासनाच्या धोरणालाही हरताळ फासला जात आहे. हा प्रकार अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारातून होत असल्याची शंकाही तक्रारीतून व्यक्त करण्यात आली. याकडे लक्ष देत कारवाईची मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)सावंगी (येंडे) घाटातील अवैध रेती वाहतूक सुरूदेवळी तालुक्यातील सावंगी (येंडे) रेती घाटाचा लिलाव झाला; पण या घाटातून परवानगीपेक्षा अधिक रेतीचा उपसा करण्यात आला. काही दिवस रेतीची लयलूट केल्यानंतर सध्या उपसा बंद असल्याचे सांगण्यात येते. रेतीची वाहतूक करणारे चालक, मालक वेळ, तारीख नसलेल्या रॉयल्टी स्लिप एकदाच घेतात. लिलाव झालेल्या घाटाच्या मालकांकडून व त्यानंतर वाहन चालक, मालक एकाच रॉयल्टी स्लिपवर १० ते १५ वेळा रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची तक्रार सावंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे. रस्त्यात एखादा अधिकारी रेतीचे ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टर पकडताना दिसले की, लगेच चालक, मालक वेळ व दिनांक आपल्या हाताने लिहितात. रॉयल्टीची रेती वाहतूक करीत असल्याचे दाखविले जाते. महसूल अधिकारी रेती घाटावर छापा मारतात; पण घाटधारक व वाहतूकदारांना याची पूर्वकल्पना मिळते. मग, ते आपली वाहने लिलाव झालेल्या घाटामध्ये उभी करतात.आष्टी तालुक्यातही लूटवर्धा नदीवरील बहुतांश रेती घाटांतून रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. यात लिलाव झालेल्या घाटातून परवानगीपेक्षा अधिक तर लिलाव न झालेल्या घाटांतून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात असल्याचे दिसते. आष्टी तालुक्यातील घाटांतूनही जेसीबी, पोकलॅण्ड व बोटींद्वारे रेतीचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. गतवर्षी सावंगी येंडे घाटात बोटीही जाळण्यात आल्या होत्या. हा प्रकार रोखणे गरजेचे आहे.परिणामी, अधिकाऱ्यांना रित्या हातानेच परतावे लागते. हा प्रकार देवळी तालुक्यात अधिक होत असल्याचेही दिसून येते. अधिकाऱ्यांच्या पाळतीवरच घाटधारक काही व्यक्ती नेमत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.