शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दोन मार्गांवर दीड कोटींची अतिरिक्त भाडे वसुली

By admin | Updated: June 17, 2017 00:36 IST

येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात

 राज्य परिवहन महामंडळाचा प्रताप : वर्धा व जाम प्रवासी अंतराच्या फेरमोजणीची गरज भास्कर कलोडे । लोकमत न्यूज नेटवर्क हिंगणघाट : येथील बसस्थानक ते वायगाव (निपाणी) चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकाचे अंतर प्रत्यक्षात ४१ किमी असतांना ते ४२ पेक्षा अधिक किलोमीटर दाखवून प्रति प्रवासी एक टप्याचे ६ रुपए ३० पैसे अधिक वसूल केल्या जात आहे. असाच प्रकार हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासासाठी अर्ध्या टप्प्याचे भाडे अधिक घेतल्या जात आहे. यातून वर्षांला जवळपास दीड कोटींच्या अतिरिक्त भाडे वसुलीचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे या दोन्ही प्रवासी अंतराची फेरमोजनी करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. वर्धा हे जिल्ह्याचे ठिकाण असून अहेरी, चंद्रपूर, राजुरा, गडचिरोली, वरोरा, वणीकडुन हिंगणघाट मार्गे वर्धा, परतवाडा, पुलगाव, शिर्डी, औरंगाबाद, अकोला, अमरावती, शेगांव, दर्यापूर, आर्वी, यवतमाळ, आष्टी, आकोटकडे आवागमन करणाऱ्या ११८ बसफेरीद्वारे दररोज जवळपास ५ हजार प्रवाशांचे आवागमन होते आहे. प्रती प्रवासी सव्वा सहा रुपये प्रमाणे दररोज ३३ हजार तर वर्षाला अंदाजे १ कोटी २० लाखांचे अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली हिंगणघाट वर्धा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे. पूर्वी हिंगणघाट बस स्थानकातून सुटणारी बस वायगाव बस स्थानकावरुन चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानक जात असताना त्याचे अंतर ४५.३ किमी. असल्याचे दर्शवून आठ टप्प्याचे प्रवासी भाडे आकारल्या जात होते. गत अनेक वर्षांपासून ही बस वायगाव बसस्थानकावर न जाता वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावर पोहचते. या मार्गे हिंगणघाट बस स्थानकातील फलाटापासून नंदोरी चौक वणा नदी पूल, धोत्रा चौरस्ता, वायगाव चौरस्ता मार्गे वर्धा बस स्थानकावरील फलाटापर्यंतचे अंतर ४१ किमी आहे. प्रती सहा किमी अंतराचा एक टप्पा या प्रमाणे सात टप्याच्या ४२ किमीच्या आंत दोन्ही बस स्थानक येत आहे; परंतु बस भाडे मात्र आजही आठ टप्प्याचे वसूल केल्या जात आहे. हिंगणघाट -जाम मार्गावरही तोच प्रकार हिंगणघाट जाम चौरस्ता प्रवासी अंतर १२ किमीच्या आत असताना जुने बसस्थानक ते जाम चौरस्ता बस स्थानकापर्यंतचे अंतर १२.९ की. मी. असल्याचे दर्शवून दोन टप्प्यांऐवजी अडीच टप्प्याच्या बस भाड्याची वसूली केली जात आहे. हिंगणघाटवरुन नागपूर, चंद्रपूर, हैदराबाद, पांढरकवडा, गिरड, उमरेडकडे आवागमन करणाऱ्या ३१७ बस फेरीद्वारे जाम चौरस्ता पर्यत प्रवास करून इतरत्र आवागमन करणाऱ्यांची संख्या दररोज जवळपास अडीच हजार आहे. अशास्थीतीत प्रती प्रवासी तीन रुपये प्रमाणे दररोज साडे सात हजार तर वर्षाला अंदाजे ३० लाखांची अतिरिक्त प्रवासी भाडे वसुली या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाकडून होत आहे. या दोन्ही मार्गाची अंतर मोजणी आता कालबाह्य झाली असून नव्याने अंतर मोजणी अत्यावश्यक आहे.