शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गहाण सोन्यासाठी शेतकऱ्यांकडून जादा वसुली

By admin | Updated: December 4, 2015 02:12 IST

शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली.

तालुक्यातील सावकारी कर्जाच्या ८५७ प्रकरणांना मंजुरीकारंजा (घाडगे) : शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली. या प्रकरणातून येथील दहा सावकारांच्या खात्यात ७३ लाख २ हजार रुपये जमा झाले. कर्जमाफीमुळे गहाण ठेवलेले सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असताना काही सावकारांकडून या शेतकऱ्यांना अधिकच्या रकमेची मागणी करून वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तालुक्यातून अधिकृत सावकारांची संख्या १० आहे. त्यांच्याकडून कर्ज घेण्यात आलेली एकूण १ हजार ४८५ कर्ज प्रकरणे माफीकरिता शासनाकडे आली होती. यात तपासणी अंती तलाठ्याच्या अहवालानुसार ८५७ प्रकरणे शासन दरबारी मंजूर झाली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२३ प्रकरणांना निपटारा होऊन १६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम सावकारांच्या खात्यात जमा करण्यात आली. संबंधीत शेतकऱ्याचे सोने परत करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ४३४ प्रकरणे मंजूर झालीत. या प्रकरणाची ७३ लाख २ हजार रुपयाचंी रक्कम सावकाराच्या खात्यात जमा करण्यात आली. सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही सावकार शेतकऱ्यांना शासनाकडून जेवढी रक्कम मुद्दल व व्याजासहीत शासन दराने मंजूर झाली त्यापेक्षा जादा रक्कमेची मागणी करीत आहे. शेतकऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांचे गहाण परत करण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशा काही तक्रारी सहायक निबंधक कार्यालयात आल्या आहेत. काही सावकारांनी सोने गहाण करताना शेतकऱ्यांना कच्चा पावत्या दिल्या आहेत. आता शासनाकडून पैसे मंजूर झाल्यानंतर कच्च्या पावत्या चालणार नाही. असे धोरण स्वीकारून शेतकऱ्यांना सोने परत करायला ते तयार नसल्याचे दिसून आले आहे. कच्ची पावती देवून अवैध सावकारी करणाऱ्या या सावकारांवर शासनाने त्वरीत कारवाई करावी, आणि रक्कम मंजूर झाली असतानाही, सोने परत देत नसल्याबद्दल कारवाई करावी, अशी तक्रार एकनाथ डोबले यांनी तहसीलदारांकडे केली आहे.सोने गहाण ठेवून कर्ज देण्याचा शासनाचा अधीकृत दर एक टक्का प्रतिमाह आहे, पण सावकारांनी मात्र अधिक व्याजदराने कर्ज दिले आहे. कोणत्याही नियमात न बसणारी ही व्याजाची जादा रक्कम सावकार शेतकऱ्यांची मागाहून अडवणूक करीत आहेत. याकडे जिल्ह्याच्या सहायक निबंधक कार्यालयाने लक्ष देत सावकारांवर कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)कागदपत्रांऐवजी अडली २०० प्रकरणेयेथील एका सावकाराकडे २०० प्रकरणे आहेत. मात्र त्याच्याकडून आवश्यक कागदपत्र शासनाकडे सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. या सावकाराकडून गहाण व हिशेबाचा रेकॉर्ड, इंकम टॅक्स, कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. हा रेकॉर्ड परत येताच त्या २०० शेतकऱ्यांचे सोने परत करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.