शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गहाण सोन्यासाठी शेतकऱ्यांकडून जादा वसुली

By admin | Updated: December 4, 2015 02:12 IST

शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली.

तालुक्यातील सावकारी कर्जाच्या ८५७ प्रकरणांना मंजुरीकारंजा (घाडगे) : शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सावकरी कर्ज माफ करण्यात आले. यात कारंजा तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ८५७ सावकारी कर्जाची प्रकरणे माफ झाली. या प्रकरणातून येथील दहा सावकारांच्या खात्यात ७३ लाख २ हजार रुपये जमा झाले. कर्जमाफीमुळे गहाण ठेवलेले सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. असे असताना काही सावकारांकडून या शेतकऱ्यांना अधिकच्या रकमेची मागणी करून वेठीस धरण्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. तालुक्यातून अधिकृत सावकारांची संख्या १० आहे. त्यांच्याकडून कर्ज घेण्यात आलेली एकूण १ हजार ४८५ कर्ज प्रकरणे माफीकरिता शासनाकडे आली होती. यात तपासणी अंती तलाठ्याच्या अहवालानुसार ८५७ प्रकरणे शासन दरबारी मंजूर झाली. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १२३ प्रकरणांना निपटारा होऊन १६ लाख ३० हजार रुपयांची रक्कम सावकारांच्या खात्यात जमा करण्यात आली. संबंधीत शेतकऱ्याचे सोने परत करण्यात आले.दुसऱ्या टप्प्यात ४३४ प्रकरणे मंजूर झालीत. या प्रकरणाची ७३ लाख २ हजार रुपयाचंी रक्कम सावकाराच्या खात्यात जमा करण्यात आली. सोने शेतकऱ्यांना परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही सावकार शेतकऱ्यांना शासनाकडून जेवढी रक्कम मुद्दल व व्याजासहीत शासन दराने मंजूर झाली त्यापेक्षा जादा रक्कमेची मागणी करीत आहे. शेतकऱ्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांचे गहाण परत करण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशा काही तक्रारी सहायक निबंधक कार्यालयात आल्या आहेत. काही सावकारांनी सोने गहाण करताना शेतकऱ्यांना कच्चा पावत्या दिल्या आहेत. आता शासनाकडून पैसे मंजूर झाल्यानंतर कच्च्या पावत्या चालणार नाही. असे धोरण स्वीकारून शेतकऱ्यांना सोने परत करायला ते तयार नसल्याचे दिसून आले आहे. कच्ची पावती देवून अवैध सावकारी करणाऱ्या या सावकारांवर शासनाने त्वरीत कारवाई करावी, आणि रक्कम मंजूर झाली असतानाही, सोने परत देत नसल्याबद्दल कारवाई करावी, अशी तक्रार एकनाथ डोबले यांनी तहसीलदारांकडे केली आहे.सोने गहाण ठेवून कर्ज देण्याचा शासनाचा अधीकृत दर एक टक्का प्रतिमाह आहे, पण सावकारांनी मात्र अधिक व्याजदराने कर्ज दिले आहे. कोणत्याही नियमात न बसणारी ही व्याजाची जादा रक्कम सावकार शेतकऱ्यांची मागाहून अडवणूक करीत आहेत. याकडे जिल्ह्याच्या सहायक निबंधक कार्यालयाने लक्ष देत सावकारांवर कारवाई करण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)कागदपत्रांऐवजी अडली २०० प्रकरणेयेथील एका सावकाराकडे २०० प्रकरणे आहेत. मात्र त्याच्याकडून आवश्यक कागदपत्र शासनाकडे सादर करण्यास विलंब झाल्याने त्यांना मंजुरी मिळाली नसल्याची माहिती आहे. या सावकाराकडून गहाण व हिशेबाचा रेकॉर्ड, इंकम टॅक्स, कार्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. हा रेकॉर्ड परत येताच त्या २०० शेतकऱ्यांचे सोने परत करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. या निर्णयाकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.