शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञ डॉक्टरांनी आणखी चौघांना दिली क्लिनचिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देकोरोनासाठी कसली कंबर : दोघांचा अहवाल निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप वर्धा जिल्ह्यात आढळलेला नाही. असे असले तरी विदेशातून आणि कोरोनाने भारतात पहिला बळी घेतलेल्या कर्नाटकातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेऊन आहेत. विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या २६ व्यक्तींना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत १४ दिवस ठेऊन रविवार १५ मार्चपर्यंत १४ व्यक्तींना कोरोनाचे कुठलेही लक्षण नसल्याची क्लिनचिट देण्यात आली. तर १४ दिवस निगरानीत ठेऊन कोरोनाची लक्षण न आढळल्याने मंगळवारी आणखी चार व्यक्तींना क्लिनचिट देण्यात आली आहे.यापूर्वी चीन येथील बिजिंग येथून येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांना तर साऊथ कोरीया येथून आलेल्या एका व्यक्तीला १४ दिवस तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगरानीत ठेऊन क्लिनचिट देण्यात आली आहे. तर इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सदर अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आता दुबई येथून आलेले सात, अ‍ैझान येथून आलेला एक तर सोमवार १६ मार्चला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना बाधित देशातून प्रवास करुन आलेल्या ४५ व्यक्ती आणि कर्नाटकातील कलबुर्गी येथून आलेल्या सहा विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवण्यात आले आहे. एकूणच विदेशवारीसह कर्नाटक येथून आलेल्या या ५९ व्यक्तींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आतापर्यंत आढळून आलेली नाही; पण दक्षता म्हणून त्यांना त्यांच्या घरात म्हणजे होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेऊन आहेत. क्लिनचिट मिळालेल्यांमध्ये इंडोनेशिया येथून आलेल्या दोघांचा तर इटली आणि इरान येथून आलेल्या प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु, दक्षता म्हणून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. खोकलताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल धरावा.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर