शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ गावाचा विकास वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:29 IST

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. परंतु सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोषफक्त गांधींशी संबंधीतच कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखडा तयार करून येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक पार पडली. व या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. परंतु या आराखड्यात मुळ गावाच्या विकासाचा अंतर्भाव नसल्याने सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्राम आश्रमातील समाविष्ट कामे जलदगतीने सुरू आहे. एवढे नव्हे तर या आराखड्यात वरूड आणि पवनार या दोन गावांसाठी १७ कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या आराखड्याला सेवाग्राम नाव असले तरी मुळ सेवाग्राम गावाच्या विकासासाठी निधीचा अंतर्भाव करण्यात आला नाही. सेवाग्राम गाव राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे जगात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून पर्यटक, अभ्यासक येथे येतात. मात्र मुळ सेवाग्राम गावात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. गावात कस्तुरबा रुग्णालय, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय, प्राकृतिक चिकित्सा विद्यापीठ आदी मोठ्या संस्था आहे. सेवाग्रामचा विस्तार झपाट्याने वाढत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या या आराखड्यात सेवाग्राम गावाच्या विकास कामांना वगळण्यात आले आहे.च्२ आक्टोबर २०१७ ला सेवाग्राम येथे गांधी जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी गावातील रस्ते, भुमीगत नाल्या, गटारे व आवश्यक विकास कामे करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. अशी माहिती पंचायत समिती सदस्य भारती उगले यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु राज्य सरकारने वरूड व पवनार या दोन गावांसाठी १७ कोटीचा निधी दिला. परंतु गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामसाठी निधी देण्यात दुजाभाव दाखविण्यात आला असा आरोप यांनी उगले यांनी केला आहे. शासनाने या पुर्वी सेवाग्राम, बरबडी, नांदोरा, वरूड, कामठवाडा या ५ गावांचा समावेश केला. वरूड वगळता अन्य गावांना निधी मात्र दिला नाही. त्यामुळे जी कामे सुरू आहे. ती केवळ आश्रम व त्यांच्याशी निगडीत संस्थांमध्येच सुरू आहे.

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून सेवाग्राम गावाच्या विकासावर अन्याय होत आहे. निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. शासन याबाबत उदासीन दिसत आहे.भारती उगले, पं.स. सदस्य, राकाँ. वर्धा

टॅग्स :Sewagramसेवाग्राम