शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ गावाचा विकास वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:29 IST

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. परंतु सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोषफक्त गांधींशी संबंधीतच कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखडा तयार करून येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक पार पडली. व या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. परंतु या आराखड्यात मुळ गावाच्या विकासाचा अंतर्भाव नसल्याने सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्राम आश्रमातील समाविष्ट कामे जलदगतीने सुरू आहे. एवढे नव्हे तर या आराखड्यात वरूड आणि पवनार या दोन गावांसाठी १७ कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या आराखड्याला सेवाग्राम नाव असले तरी मुळ सेवाग्राम गावाच्या विकासासाठी निधीचा अंतर्भाव करण्यात आला नाही. सेवाग्राम गाव राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे जगात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून पर्यटक, अभ्यासक येथे येतात. मात्र मुळ सेवाग्राम गावात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. गावात कस्तुरबा रुग्णालय, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय, प्राकृतिक चिकित्सा विद्यापीठ आदी मोठ्या संस्था आहे. सेवाग्रामचा विस्तार झपाट्याने वाढत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या या आराखड्यात सेवाग्राम गावाच्या विकास कामांना वगळण्यात आले आहे.च्२ आक्टोबर २०१७ ला सेवाग्राम येथे गांधी जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी गावातील रस्ते, भुमीगत नाल्या, गटारे व आवश्यक विकास कामे करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. अशी माहिती पंचायत समिती सदस्य भारती उगले यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु राज्य सरकारने वरूड व पवनार या दोन गावांसाठी १७ कोटीचा निधी दिला. परंतु गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामसाठी निधी देण्यात दुजाभाव दाखविण्यात आला असा आरोप यांनी उगले यांनी केला आहे. शासनाने या पुर्वी सेवाग्राम, बरबडी, नांदोरा, वरूड, कामठवाडा या ५ गावांचा समावेश केला. वरूड वगळता अन्य गावांना निधी मात्र दिला नाही. त्यामुळे जी कामे सुरू आहे. ती केवळ आश्रम व त्यांच्याशी निगडीत संस्थांमध्येच सुरू आहे.

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून सेवाग्राम गावाच्या विकासावर अन्याय होत आहे. निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. शासन याबाबत उदासीन दिसत आहे.भारती उगले, पं.स. सदस्य, राकाँ. वर्धा

टॅग्स :Sewagramसेवाग्राम