शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्राम विकास आराखड्यातून मूळ गावाचा विकास वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:29 IST

महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. परंतु सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये असंतोषफक्त गांधींशी संबंधीतच कामे होणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनाला २ आॅक्टोबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे सेवाग्राम विकास आराखडा तयार करून येथील विकास कामांना चालना दिली जात आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात याबाबत बैठक पार पडली. व या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या. परंतु या आराखड्यात मुळ गावाच्या विकासाचा अंतर्भाव नसल्याने सेवाग्राम गावाच्या विकासासाठी पैसा खर्च होणार नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत सेवाग्राम आश्रमातील समाविष्ट कामे जलदगतीने सुरू आहे. एवढे नव्हे तर या आराखड्यात वरूड आणि पवनार या दोन गावांसाठी १७ कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. या आराखड्याला सेवाग्राम नाव असले तरी मुळ सेवाग्राम गावाच्या विकासासाठी निधीचा अंतर्भाव करण्यात आला नाही. सेवाग्राम गाव राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे जगात प्रसिद्ध आहे. देश विदेशातून पर्यटक, अभ्यासक येथे येतात. मात्र मुळ सेवाग्राम गावात पायाभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. गावात कस्तुरबा रुग्णालय, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालय, अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय, प्राकृतिक चिकित्सा विद्यापीठ आदी मोठ्या संस्था आहे. सेवाग्रामचा विस्तार झपाट्याने वाढत आहेत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या या आराखड्यात सेवाग्राम गावाच्या विकास कामांना वगळण्यात आले आहे.च्२ आक्टोबर २०१७ ला सेवाग्राम येथे गांधी जयंतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी गावातील रस्ते, भुमीगत नाल्या, गटारे व आवश्यक विकास कामे करण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. अशी माहिती पंचायत समिती सदस्य भारती उगले यांनी लोकमतशी बोलताना दिली. परंतु राज्य सरकारने वरूड व पवनार या दोन गावांसाठी १७ कोटीचा निधी दिला. परंतु गांधींची कर्मभूमी असलेल्या सेवाग्रामसाठी निधी देण्यात दुजाभाव दाखविण्यात आला असा आरोप यांनी उगले यांनी केला आहे. शासनाने या पुर्वी सेवाग्राम, बरबडी, नांदोरा, वरूड, कामठवाडा या ५ गावांचा समावेश केला. वरूड वगळता अन्य गावांना निधी मात्र दिला नाही. त्यामुळे जी कामे सुरू आहे. ती केवळ आश्रम व त्यांच्याशी निगडीत संस्थांमध्येच सुरू आहे.

या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र पाठवून सेवाग्राम गावाच्या विकासावर अन्याय होत आहे. निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली आहे. शासन याबाबत उदासीन दिसत आहे.भारती उगले, पं.स. सदस्य, राकाँ. वर्धा

टॅग्स :Sewagramसेवाग्राम