शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' सीन; आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
10
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
11
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
13
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
14
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
15
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
16
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
17
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
18
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
19
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
20
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

रोज १० हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: August 5, 2016 01:54 IST

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे.

बसगाड्या कुठेही पडतात बंद : अनेकवेळा महत्त्वाच्या तासिकांना बसते दांडी वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे. ही पास काढल्यानंतर आपल्याला बसमधून जात वेळेवर शाळा गाठता येईल, असे या पासधारक विद्यार्थ्यांना वाटत असताना परिवहन विभागाच्या बेभरवश्याच्या बसगाड्यांमुळे त्यांची अडचण होत आहे. बस येईल अथवा नाही या विचाराने या विद्यार्थ्यांना जीव रोजच टांगणीला लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शासनाच्या योजनेनुसार वर्धा परिवहन महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत एकूण ५ हजार ८७ विद्यार्थ्यांनी पास काढली आहे. तर अहिल्याबाई होळकर योजनेंतगर्गत ४ हजार ५०० विद्यार्थिनींना पास देण्यात आली आहे. या दोन्ही योजनेंतर्गत आठही तालुक्यातील विद्यार्थी शहरी भागात शिक्षणाकरिता ये-जा करीत आहेत. मात्र त्यांना महामंडळाच्या बसगाड्यांच्या अनागोंदीचे चटके सहन करावे लागत आहे. परिवहन महामंडळाच्या बसगाड्या रस्त्याने धावण्यापेक्षा त्या धावताना रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाणच अधिक असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासह शाळा संपल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या वेळेत बसगाड्या येणे अपेक्षित असताना तसे घडत नाही. बसगाड्यांच्या नादुरूस्त अवस्थेमुळे बऱ्याच वेळी वेळेवरच फेऱ्या रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना शाळेला वा महाविद्यालयांना दांडी देण्याची वेळ येते. तर शाळा सुटल्यानंतर वेळेवर येत नसलेल्या बसगाड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे घर गाठण्याकरिता रात्र होते. अशीच घटना बुधवारी देवळी येथे घडली. तब्बल तीन तास बस आली नसल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा प्रश्न सुटला. चार तासानंतर येथे बसगाडी आली. यानंतर एकाच वेळी दोन बसगाड्या आल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाणे सोईचे झाले. प्रवासी संख्या वाढविण्याकरिता याच विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी नादुरूस्त व भंगार बसेसमुळे महामंडळाच्या योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसते.(प्रतिनिधी) देवळीतील घटनेने राज्य परिवहन महामंडळ काही बोध घेईल का ? वेळेवर बस असली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठण्याचा प्रकार बुधवारी देवळी येथे घडला. यावेळी बस न येण्यामागचे कारण पोलिसांकडून विचारताच महामंडळाकडून तत्काळ बसची व्यवस्था करण्यात आली. जर वेळीच महामंडळाने बसची व्यवस्था केली असती तर अशी वेळ आली नसती, असे बोलले जात आहे. बसकरिता जर विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येत असेल तर मग महामंडळाकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता असलेल्या योजनांचा काय उपयोग, असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. पास असतानाही आर्थिक भुर्दंड परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतर्गत पास असताना केवळ वेळेवर बसगाड्या येत नसल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मग पैसे मोजून पास काढून काय उपयोग, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे.