शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रोज १० हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: August 5, 2016 01:54 IST

राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे.

बसगाड्या कुठेही पडतात बंद : अनेकवेळा महत्त्वाच्या तासिकांना बसते दांडी वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक योजनेनुसार जिल्ह्यात एकूण ९ हजार ५८७ विद्यार्थ्यांनी महिनेवारीची पास काढली आहे. ही पास काढल्यानंतर आपल्याला बसमधून जात वेळेवर शाळा गाठता येईल, असे या पासधारक विद्यार्थ्यांना वाटत असताना परिवहन विभागाच्या बेभरवश्याच्या बसगाड्यांमुळे त्यांची अडचण होत आहे. बस येईल अथवा नाही या विचाराने या विद्यार्थ्यांना जीव रोजच टांगणीला लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. शासनाच्या योजनेनुसार वर्धा परिवहन महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत एकूण ५ हजार ८७ विद्यार्थ्यांनी पास काढली आहे. तर अहिल्याबाई होळकर योजनेंतगर्गत ४ हजार ५०० विद्यार्थिनींना पास देण्यात आली आहे. या दोन्ही योजनेंतर्गत आठही तालुक्यातील विद्यार्थी शहरी भागात शिक्षणाकरिता ये-जा करीत आहेत. मात्र त्यांना महामंडळाच्या बसगाड्यांच्या अनागोंदीचे चटके सहन करावे लागत आहे. परिवहन महामंडळाच्या बसगाड्या रस्त्याने धावण्यापेक्षा त्या धावताना रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाणच अधिक असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासह शाळा संपल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या वेळेत बसगाड्या येणे अपेक्षित असताना तसे घडत नाही. बसगाड्यांच्या नादुरूस्त अवस्थेमुळे बऱ्याच वेळी वेळेवरच फेऱ्या रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना शाळेला वा महाविद्यालयांना दांडी देण्याची वेळ येते. तर शाळा सुटल्यानंतर वेळेवर येत नसलेल्या बसगाड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे घर गाठण्याकरिता रात्र होते. अशीच घटना बुधवारी देवळी येथे घडली. तब्बल तीन तास बस आली नसल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस ठाणे गाठावे लागले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा प्रश्न सुटला. चार तासानंतर येथे बसगाडी आली. यानंतर एकाच वेळी दोन बसगाड्या आल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाणे सोईचे झाले. प्रवासी संख्या वाढविण्याकरिता याच विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी नादुरूस्त व भंगार बसेसमुळे महामंडळाच्या योजना जिल्ह्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसते.(प्रतिनिधी) देवळीतील घटनेने राज्य परिवहन महामंडळ काही बोध घेईल का ? वेळेवर बस असली नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट पोलीस ठाणे गाठण्याचा प्रकार बुधवारी देवळी येथे घडला. यावेळी बस न येण्यामागचे कारण पोलिसांकडून विचारताच महामंडळाकडून तत्काळ बसची व्यवस्था करण्यात आली. जर वेळीच महामंडळाने बसची व्यवस्था केली असती तर अशी वेळ आली नसती, असे बोलले जात आहे. बसकरिता जर विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येत असेल तर मग महामंडळाकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता असलेल्या योजनांचा काय उपयोग, असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. पास असतानाही आर्थिक भुर्दंड परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतर्गत पास असताना केवळ वेळेवर बसगाड्या येत नसल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. मग पैसे मोजून पास काढून काय उपयोग, असे म्हणण्याची वेळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर आली आहे.