शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

शिवराज्याभिषेक इतिहासाला कलाटणी देणारी घटना

By admin | Updated: June 8, 2015 02:34 IST

शेकडो वर्षे स्वत्त्व हरवून बसलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमानाचा अंकुर फुलविणाऱ्या रयतेकरिता शिवरायांचा राज्याभिषेक ही घटना गौरवास्पद तर होतीच;

वर्धा : शेकडो वर्षे स्वत्त्व हरवून बसलेल्या रयतेच्या मनात स्वाभिमानाचा अंकुर फुलविणाऱ्या रयतेकरिता शिवरायांचा राज्याभिषेक ही घटना गौरवास्पद तर होतीच; शिवाय इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना होती, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय योगपटू प्रशांत रोकडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशन, संभाजी ब्रिगेड, युवा सोशल फोरम, ओबीसी युवक क्रांती दलातर्फे येथील विश्रामगृह येथे शनिवारी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी रोकडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला शंभूराजे सोशल आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष सुधीर पांगूळ, संभाजी ब्रिगेडचे मंगेश विधळे, जीवन चोरे, प्रवीण जगताप आदींची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज धर्माभिमानी होते. परंतु धर्मवेडे नव्हते. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, वाईट रुढी-परंपरा मोडीत त्यांनी काढल्या. धर्मशास्त्र गुंडाळून ठेवले. शिवाजी महाराज हे धर्मसुधारक, समाजसुधारक व मानवतावादी होते. जगावर आपलं प्रत्येक क्षेत्रात अधिराज्य निर्माण करणारा जगातील एकमेव कर्तृत्ववान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे विचार मंगेश विधळे यांनी यावेळी व्यक्त केले. यानंतर बोलताना सुधीर पांगुळ म्हणाले, उद्योग-व्यापारास चालना शिवरायांनी दिली. विविध वस्तूंना बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या. करसवलती देणे, आयात-निर्यात धोरण, स्वदेशी मालास उपयुक्त ठेवणे याकडे महाराजांनी विशेष लक्ष दिले, असे सांगितले. कार्यक्रमाला मिलिंद मोहोड, पराग भोयर, मयूर डफळे, प्रसन्ना इंगोले, श्याम बोटकुले, सतीश लांबट, पंकज अनकर, विवेक तळवेकर, सचिन हजारे, रूपेश वाघमारे आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)