शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST

रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही.

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकावरील प्रकार : प्रवाशांमध्ये संभ्रम, अनाऊन्समेंटही चुकीची

प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही. ते थेट रेल्वे स्थानकावर येतात; पण वर्धा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी गेलेल्या गाड्यांची ‘पोझीशन’ही रात्री उशीरापर्यंत ‘स्क्रिन’वर झळकत असल्याने संभ्रम निर्माण होतो. शिवाय ‘अनाऊंसमेंट’ही चुकीचे केले जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मुंबई येथे मंगळवारी पुन्हा अपघातस्थळावर रुळाखालची माती सरकली. या पार्श्वभूमीवर गाड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधींनी स्टेशनवर फेरफटका मारल्यावर ही परिस्थिती लक्षात आली.नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्प्रेसला अपघात झाला. या अपघातामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. यामुळे रेल्वे स्थानकावर कोणती गाडी किती वाजता येणार आहे वा गेली, हे दर्शविणे गरजेचे असते; पण वर्धा रेल्वे स्थानकावर अनेकदा गाड्या वर्धा रेल्वे स्थानकावरून पास झालेल्या असताना रात्री ११ वाजेपर्यंत त्या मुख्य स्क्रिनवर दाखविल्या जातात. सायंकाळी ६.२४ वाजता वर्धा रेल्वे स्थानकावरून सुटणारी नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस रात्री ११ वाजता प्रवाशांना स्क्रिनवर दिसली तर ते चक्रावतात. मागील काही दिवसांपासून वर्धा रेल्वे स्थानकावर हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान सुटणाºया रेल्वे गाड्या रात्री १० ते ११ वाजेपर्यंत स्क्रिनवर दाखविल्या जातात. या प्रकारामुळे रेल्वेगाड्या इतक्या उशिरा धावत आहेत काय, असा प्रश्न प्रवाशांना पडल्याशिवाय राहत नाही. वर्धा रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेत ‘स्क्रिन’वरील ‘डिस्प्ले’कडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. या साºया गोंधळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल आहे.सेवाग्राम एक्स्प्रेसची सूचनाच नसतेनागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रात्री १० वाजून १० मिनीटांनी वर्धा रेल्वे स्थानकावर येते. २० मिनीट बल्लारशहा येथून पॅसेंजरने जोडून येणाºया आरक्षित डब्यांना जोडण्यासाठी देण्यात आले आहे. गाडी २० मिनीट थांबत असल्याने प्रवासी निश्चिंत फलाटावर बसलेले असतात. ही गाडी १०.३० वाजता रेल्वे स्थानकावरून सुटणे अपेक्षित असते; पण ती कधीही वेळेवर सोडली जात नाही. १०.१० ला आलेली गाडी दररोज रात्री १०.४५ ते ११ वाजताच्या सुमारास सोडली जाते. ही गाडी सोडत असताना कुठल्याही प्रकारचे अनाऊंसमेंट केले जात नाही. परिणामी, फलाटावर निश्चिंत बसलेल्या प्रवाशांची धावपळ होते. अनेकदा अचानक गाडी सुरू होत असल्याने अनेकांना गाडी सोडून द्यावी लागते. या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी असलेले वर्धा रेल्वे प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.