शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

शीतदही होऊनही सोयाबीनचा पत्ता नाही

By admin | Updated: October 13, 2014 23:26 IST

यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन

वायगाव (नि.) : यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन एक महिना पुढे गेले. शीतदही आटोपून आता कापूस वेचायला सुरुवातही झाली आहे. पण अद्याप सोयाबीन हाते न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यंदा पावसाने चांगलाच दगा दिल्याने खरीप हंगाम हिरावला गेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तर तोडचे पाणीच पळाले आहे. पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची स्थितीही तितकीशी चांगली नाही. कारण सततच्या भारनियमनाने व्यवस्थित ओलितही त्यांना करता आलेले नाही. दरवर्षी दिवाळी आधी सोयाबीन चे उत्पन्न हाती येते. ते विकून शेतकऱ्यांना कशीबशी दिवाळी साजरी करता येत होती. कुठेकुठे शीतदही होऊन कापूस वेचण्याची तयारीही सुरू झाली आहे. पण सोयाबीनची सवंगणी मात्र सुरू झाली नसल्याने दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने पऱ्हाटीही करपत चालली आहे. सोयाबीन ला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या आहे. तसेच पिकावर रोगाने मारा केला आहे. दुबार-तिबार पेरणी नंतरही पीक हाती येणार की नाही या विवंचनेत आहे. खरीप हंगामाकरिता बळीराजाने केलेल्या उसनवारीचा व कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे. सोयाबीनचे दाण्याचा आकार ज्वारीच्या दाण्याएवढा आहे. त्यामुळे उत्पादन झाले तरी ते किती होणार याचाही विचार शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कापसाने तरी साथ देण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)