शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
2
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
3
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
4
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
5
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
6
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
7
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
8
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
9
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
10
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
11
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
12
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
13
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
14
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
15
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
16
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
17
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
18
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
19
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
20
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा

शीतदही होऊनही सोयाबीनचा पत्ता नाही

By admin | Updated: October 13, 2014 23:26 IST

यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन

वायगाव (नि.) : यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दुबार तर कोणाला तिबार पेरणी करावी लागली या कारणाने बळीराजा पुरता बेजार झाला आहे. नेमक्या वेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे उत्पादन एक महिना पुढे गेले. शीतदही आटोपून आता कापूस वेचायला सुरुवातही झाली आहे. पण अद्याप सोयाबीन हाते न आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यंदा पावसाने चांगलाच दगा दिल्याने खरीप हंगाम हिरावला गेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तर तोडचे पाणीच पळाले आहे. पण ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांची स्थितीही तितकीशी चांगली नाही. कारण सततच्या भारनियमनाने व्यवस्थित ओलितही त्यांना करता आलेले नाही. दरवर्षी दिवाळी आधी सोयाबीन चे उत्पन्न हाती येते. ते विकून शेतकऱ्यांना कशीबशी दिवाळी साजरी करता येत होती. कुठेकुठे शीतदही होऊन कापूस वेचण्याची तयारीही सुरू झाली आहे. पण सोयाबीनची सवंगणी मात्र सुरू झाली नसल्याने दिवाळी कशी साजरी होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाणी नसल्याने पऱ्हाटीही करपत चालली आहे. सोयाबीन ला शेंगा फार कमी प्रमाणात लागल्या आहे. तसेच पिकावर रोगाने मारा केला आहे. दुबार-तिबार पेरणी नंतरही पीक हाती येणार की नाही या विवंचनेत आहे. खरीप हंगामाकरिता बळीराजाने केलेल्या उसनवारीचा व कर्जाचा डोंगर वाढतच जात आहे. सोयाबीनचे दाण्याचा आकार ज्वारीच्या दाण्याएवढा आहे. त्यामुळे उत्पादन झाले तरी ते किती होणार याचाही विचार शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे. कापसाने तरी साथ देण्याची आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)