शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदेशानंतरही मुद्रांक शुल्काची सक्ती कायम

By admin | Updated: April 14, 2017 02:16 IST

विद्यार्थी व नागरिकांना काही प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांनी माफ केले;

अधिकाऱ्यांची हेकेखोरी : सामान्यांवर भुर्दंडरोहणा : विद्यार्थी व नागरिकांना काही प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांनी माफ केले; पण तहसील, न्यायलये व शासकीय कार्यालयांत मुद्रांक शुल्क आकारणे सुरूच होते. यामुळे शासनाने पुन्हा सर्व कार्यालय प्रमुखांना मुद्रांक शुल्क न आकारण्याबाबत लेखी पत्रान्वये ९ मार्च रोजी अवगत केले. असे असताना मुद्रांक शुल्क आकारणी सुरूच आहे. राज्य शासनाने जात, उत्पन्न, वास्तव्य व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांवर लोकहितास्तव मुद्रांक शुल्क माफ केले आहे. ही बाब शासनाच्या महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबईने राज्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या लक्षात आणून दिली. शिवाय मुद्रांक शुल्क घेऊ नये, असा आदेश दिला. यानंतरही उपरोक्त सर्व प्रमाणपत्र व प्रतिज्ञा पत्रांसाठी मुद्रांक शुल्क आकारणी अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांद्वारे चालूच राहिली. लोकप्रतिनिधी व जाणकारांमार्फत शासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. शासकीय आदेशाचे प्रशासन उल्लंघन करीत आहे, हे सिद्ध झाल्यावर शासनाने पुन्हा शासकीय अधिकारी व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मुद्रांक शुल्क आकरू नये वा यासाठी स्टँम्पपेपर विकत घेण्याची सक्ती करू नये, असे कळविले आहे; पण या आदेशानंतर आता ७ वर्षे लोटली असताना मुद्रांक शुल्क आकारणी करणे अधिकाऱ्यांनी थांबविल्याचे दिसत नाही. जात, उत्पन्न, वास्तव्य व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तयार करताना विद्यार्थ्यांना १०० रुपयांचा स्टँम्पपेपर खरेदी करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात व न्यायालयात कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर करताना ते साध्या कागदावर स्वीकारण्याऐवजी १०० रुपयांच्या मुद्रांक पेपरवरच स्वीकारला जातो. एखाद्याने शासनाच्या या आदेशाची आठवण करून दिल्यास त्याला मुर्खात काढले जाते व त्याची अडवणूक करण्यात येते. विद्यार्थी व सामान्य नागरिकांची सर्रास आर्थिक लुट करण्याचा हा प्रकार मागील १३ वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. आम्ही कोणतेही परिपत्रक काढले तरी त्यात शासनाचे आर्थिक नुकसान होत असेल तर त्याची आपण अंमलबजावणी न करता वसुली सुरूच ठेवावी, असा गुप्त करार शासन व प्रशासनामध्ये झाला असावा, असा संशय सामान्यांकडून व्यक्त केला जात आहे. शिवाय शासनाच्या नियंत्रणात काम करणारे अधिकारी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी खात्री नागरिक व्यक्त करतात. शासनाने दुटप्पी धोरण सोडून अधिकाऱ्यांना मुद्रांक शुल्क आकारणी न करण्याबाबत कडक सूचना द्याव्या, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)