शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

समृध्दी महामार्गावर पर्यावरण जनसुनावणी

By admin | Updated: March 24, 2017 01:55 IST

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे.

वर्धा : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे नुकसान १ लाख ६ हजार वृक्ष लागवड करून भरून काढले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावणीत शेतकऱ्यांना सांगितले. नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या पॅकेज १ मधील नागपूर ते पिंपळगाव(वर्धा) दरम्यानच्या प्रकल्पात जाणाऱ्या भूधारकांसाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी विकास भवन येथे गुरूवारी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी हे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे उपस्थित होते. प्रकल्पातील रस्त्याच्या बांधकामात होणारी वृक्षतोड व पर्यावरणविषयी अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्तर देताना नरेंद्र टोपे म्हणाले, प्रकल्पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्प भागात हवेतील गुणवत्ता, ध्वनीची पातळी, माती व पाण्याची गुणवत्ता विचारात घेतली जाईल्. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. जमिनीची धूप कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहे. प्रकल्प बांधकामात वापरण्यात येणारी वाहने प्रदुषण मुक्त प्रमाणीत करुनच वापरण्यात येईल. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे करणार आहे. यानंतर भूधारकांनी भूसंचयन व शेतीच्या मोबदल्याविषयी तक्रारी मांडल्या. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)