शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

समृध्दी महामार्गावर पर्यावरण जनसुनावणी

By admin | Updated: March 24, 2017 01:55 IST

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे.

वर्धा : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे नुकसान १ लाख ६ हजार वृक्ष लागवड करून भरून काढले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावणीत शेतकऱ्यांना सांगितले. नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या पॅकेज १ मधील नागपूर ते पिंपळगाव(वर्धा) दरम्यानच्या प्रकल्पात जाणाऱ्या भूधारकांसाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी विकास भवन येथे गुरूवारी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी हे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे उपस्थित होते. प्रकल्पातील रस्त्याच्या बांधकामात होणारी वृक्षतोड व पर्यावरणविषयी अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्तर देताना नरेंद्र टोपे म्हणाले, प्रकल्पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्प भागात हवेतील गुणवत्ता, ध्वनीची पातळी, माती व पाण्याची गुणवत्ता विचारात घेतली जाईल्. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. जमिनीची धूप कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहे. प्रकल्प बांधकामात वापरण्यात येणारी वाहने प्रदुषण मुक्त प्रमाणीत करुनच वापरण्यात येईल. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे करणार आहे. यानंतर भूधारकांनी भूसंचयन व शेतीच्या मोबदल्याविषयी तक्रारी मांडल्या. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)