शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

समृध्दी महामार्गावर पर्यावरण जनसुनावणी

By admin | Updated: March 24, 2017 01:55 IST

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे.

वर्धा : नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग प्रकल्पात बाधित क्षेत्रातील ५६ हजार वृक्ष तोडले जाणार आहे. पर्यावरणाचे नुकसान १ लाख ६ हजार वृक्ष लागवड करून भरून काढले जाईल. त्यामुळे प्रकल्पाचा पर्यावरणावर परिणाम होणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे यांनी पर्यावरण विषयक जनसुनावणीत शेतकऱ्यांना सांगितले. नागपूर-मुंबई प्रस्तावित महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या पॅकेज १ मधील नागपूर ते पिंपळगाव(वर्धा) दरम्यानच्या प्रकल्पात जाणाऱ्या भूधारकांसाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी विकास भवन येथे गुरूवारी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी हे अध्यक्ष होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस, पर्यावरण सल्लागार नरेंद्र टोपे उपस्थित होते. प्रकल्पातील रस्त्याच्या बांधकामात होणारी वृक्षतोड व पर्यावरणविषयी अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी तक्रारी व आक्षेप नोंदविला. याला उत्तर देताना नरेंद्र टोपे म्हणाले, प्रकल्पात पर्यावरणातील सद्यस्थिती जाणून प्रकल्प भागात हवेतील गुणवत्ता, ध्वनीची पातळी, माती व पाण्याची गुणवत्ता विचारात घेतली जाईल्. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेऊन महामार्गाची रचना करण्यात येणार आहे. जमिनीची धूप कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहे. प्रकल्प बांधकामात वापरण्यात येणारी वाहने प्रदुषण मुक्त प्रमाणीत करुनच वापरण्यात येईल. पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा न पोहोचता कामे करणार आहे. यानंतर भूधारकांनी भूसंचयन व शेतीच्या मोबदल्याविषयी तक्रारी मांडल्या. जनसुनावणीला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)