शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

शहरात शिरलेल्या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीचा आश्रय

By admin | Updated: July 14, 2017 01:32 IST

शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात.

लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरीकरणामुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. यामुळे वातावरणात बदल होत असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. यावर्षी प्रखर उन्हाळा संपून दीड महिना झाला. पाऊसही बऱ्यापैकी झाला आहे. असे असताना वन्यजीव मानवी वस्त्यांकडे धाव घेताना दिसतात. शहरात शिरणाऱ्या या वन्यप्राण्यांना पर्यावरण बचाव समितीने आश्रय दिला आहे. आर्वी येथे मागील पाच दिवसांत तीन जखमी हरीण मिळाले. त्यात एक भेडकी व दोन चितळ नामक हरिण होते. यातील भेडकी ही काकडधरा येथे कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत आढळली. समिती सदस्यांनी तिच्यावर उपचार करून पिपल फॉर अ‍ॅनिमल वर्धा येथे उपचाराकरिता पाठविले. एक चितळ हमालपुरा येथे जखमी अवस्थेत आढळले. ते पर्यावरण बचाव समितीच्या सदस्यांनी उपचार केले. त्याची परिस्थिती सुधारल्यावर आर्वी वनविभागाचे शिवाजी सावंत यांच्या निगराणीत सारंगपूरी येथे सोडले. दुसरे चितळ जनतानगर येथे जखमी अवस्थेत असल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांना कळविले होते. नागरिकांचे सहकार्य व वनविभागाच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्या चितळावर उपचार करण्यात आले; पण गंभीर जखमी असल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही समिती वन्यप्राण्यांना जीवनदान देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.