शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवड आवश्यक

By admin | Updated: February 6, 2016 02:18 IST

पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्याने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

मोहन गुजरकर : पर्यावरणाच्या जाणीव जागृतीसाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार वर्धा : पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्याने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी छोट्या, छोट्या उपायांनीच मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले.जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धां घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या पुरस्कार विरतण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाविषयीचे जाणीव जागृती व्हावी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड, पडीत जमीन विकास, जल संवर्धन कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवासी येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला. दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. माध्यमिक गटासाठी ‘स्वच्छता अभियानात माझी भूमिका’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’, हे विषय होते. तीन गटात विभाजित चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटासाठी ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’, व माध्यमिक गटासाठी ‘माझी हरित शाळा’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘बदललेल्या ऋतुचक्राचे परिणाम’ विषय होते. वक्तृत्व स्पर्धेकरिता माध्यमिक गटांना ‘पर्यावरणस्रेही जीवनशैली’ आणि महाविद्यालयीन गटासाठी ‘जल प्रदूषणाची समस्या व त्यावरील उपाय’ विषय देण्यात आले होते. निबंध व चित्रकला स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धा प्रथम तालुकापातळीवर व नंतर जिल्हापातळीवर घेण्यात आली. निबंध लेखनाचे परीक्षण सुरेखा दुबे, रितेश निमसडे, चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सुनील रहाटे, वैशाली सावंत, राजेंद्र लांजेवार तर वक्तृत्व स्पधचे परीक्षक डॉ. प्रवीण वानखेडे व डॉ. सुनिता भोईकर, सुषमा पाखरे यांनी केले.प्रास्ताविक पी. एच. बडगे यांनी केले. आभार बी. डी. खडतकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी के. वाय. तळवेकर, व्ही. डी. गभणे, शीतल राठोड, बी.जी. राठोड, बी. बी. फटांगरे, शीला कांबळे, ए.आर. कावळे, ए. बी. वंजारी, मधुकर गायकवाड, रूपचंद चोपडे आदींनी पुढकार घेतला.(शहर प्रतिनिधी)