शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार अखेर उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो.

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा : महात्मा फुले समता परिषदेचा रेटा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाचे निमित्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या कामांचा खोळंबा झाला, त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेने याबाबत आवाज उठविला. कार्यालयाची दारे उघडला अन्यथा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला. त्यांच्या मागणीला लोकमतनेही वृत्तांच्या माध्यमातून बळ दिल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, खनिकर्म विभाग यासह अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामानिमित्त ये-जा सुरु आहे. पण, कोरोनाचे कारण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले. काही तक्रारी व निवेदने असल्यास त्यांना प्रवेशव्दारावर नियुक्त कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागतात. या तक्रारी व निवेदन अद्यापही निकाली निघाल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांच्या कामाकरिता कार्यालयाचे दार उघडावे अन्यथा २० ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनाही निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली होती. या सर्व घडामोडीकडे लोकमतनेही लक्ष वेधले. परिणामी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रा.दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, निळकंठ राऊत, भारत चौधरी, वासुदेव ढुमने, विनोद पांडे, सुनील सावध, कवडुजी बुरंगे, नंदकिशोर काळपांडे, किशोर देवतारे व सुधीर चाफले उपस्थित होते.मिनीमंत्रालयात प्रवेश बंदीचजिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो. आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार उघडे केल्याने जिल्हा परिषेदेचे दार कधी उघडले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी