शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार अखेर उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:00 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो.

ठळक मुद्देलोकमतचा पाठपुरावा : महात्मा फुले समता परिषदेचा रेटा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संसर्गाचे निमित्त करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या कामांचा खोळंबा झाला, त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेने याबाबत आवाज उठविला. कार्यालयाची दारे उघडला अन्यथा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला. त्यांच्या मागणीला लोकमतनेही वृत्तांच्या माध्यमातून बळ दिल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, जिल्हा नियोजन कार्यालय, खनिकर्म विभाग यासह अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने नागरिकांची कामानिमित्त ये-जा सुरु आहे. पण, कोरोनाचे कारण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशव्दार सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आले. काही तक्रारी व निवेदने असल्यास त्यांना प्रवेशव्दारावर नियुक्त कर्मचाऱ्यांकडे सोपवावी लागतात. या तक्रारी व निवेदन अद्यापही निकाली निघाल्या नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. त्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्वसामान्यांच्या कामाकरिता कार्यालयाचे दार उघडावे अन्यथा २० ऑगस्टपासून सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा दिला. तसेच पालकमंत्री सुनील केदार यांनाही निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली होती. या सर्व घडामोडीकडे लोकमतनेही लक्ष वेधले. परिणामी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याने महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी विभागीय अध्यक्ष प्रा.दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे, विनय डहाके, विशाल हजारे, निळकंठ राऊत, भारत चौधरी, वासुदेव ढुमने, विनोद पांडे, सुनील सावध, कवडुजी बुरंगे, नंदकिशोर काळपांडे, किशोर देवतारे व सुधीर चाफले उपस्थित होते.मिनीमंत्रालयात प्रवेश बंदीचजिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना आल्यापावलीच द्वारावरूनच परत जावे लागत आहे. मात्र, काहींचा विनाकारण जिल्हा परिषदेच्या इमारतीत वावर दिसून येतो. आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार उघडे केल्याने जिल्हा परिषेदेचे दार कधी उघडले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी